शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:52 IST

शहरातील नागरिक पाणीटंचाई, अर्धवट सिमेंट रोड व कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. नागरिकांच्या ज्वलंत समस्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून आयुक्तांना घेराव करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनानंतर विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाणीटंचाई विरोधात वेगळे आंदोलन केले. कार्यक र्त्यांनी महापौरांच्या कक्षात माठ फोडून  घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देआयुक्तांना घेराव : महापौरांच्या कक्षापुढे फोडले माठ : पाणीटंचाई व अर्धवट सिमेंट रोडच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला स्मार्ट सिटी करण्याच्या सत्तापक्षाकडून मोठमोठ्या घोषणा सुरू आहे. परंतु शहरातील नागरिक पाणीटंचाई, अर्धवट सिमेंट रोड व कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. नागरिकांच्या ज्वलंत समस्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून आयुक्तांना घेराव करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनानंतर विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाणीटंचाई विरोधात वेगळे आंदोलन केले. कार्यक र्त्यांनी महापौरांच्या कक्षात माठ फोडून  घोषणाबाजी केली.शहरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त असताना नागरिकांकाडून पाण्याचे बिल वसूल केले जात आहे. २४ बाय ७ योजना असूनही काही भागामध्ये ८-८ दिवस पाणी मिळत नाही. सिमेंट रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. यामुळे अपघात वाढले आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दवाखाने महापालिका चांगल्या पद्धतीने चालवू शकत नाही. यात सुधारणा न करता दवाखान्याचे खासगीकरण करण्याचा सपाटा मनपातील सत्तापक्षाने चालविला आहे. कनक रिसोर्सेस कंपनी शहरातील कचरा उचलण्याऐवजी साठविण्याचे काम करीत आहे. असे असूनही कनकच्या कंत्राटदारास २५ कोटी देण्यात आल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी आयुक्त वीरेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.महापालिकेने सायबरटेक कंपनीला शहरातील घराचे सर्वेक्षण करून संपत्तीकर आकारण्याची जबाबदारी सोपविली. परंतु कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केले. अनाठायी कर आकारणी करण्यात आली. असे असूनही या कंपनीवर कारवाई न करता महापालिकेने ५.५ कोटी दिले. तसेच सायबरटेकने केलेला सर्वे तपासण्यासाठी आता पुन्हा २ कोटी खर्च केले जात आहे. अशा प्रकारचे महापालिकेत जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. महापौर व पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष आहे. वंश निमय कंपनीने राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केलेले आहे. मेसर्स जे.एन.एन.यु.आर.एम. योजनेंतर्गत मिळालेल्या २६० बसेस भंगारात टाकलेल्या आहेत.

मध्य नागपुरातील महात्मा गांधी यांच्या नावाने असलेला गांधीबाग उद्यानाच्या जागेपैकी ६८,३६०चौ. फूट जागेवर नऊ मजली इमारत बांधण्याचा कट तेथील नगरसेवकाने चालू केलेला आहे. आदी मागण्यांचे  निवेदन विकास ठाकरे यांनी अयुक्तांना दिले.आंदोलनात उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, अ‍ॅड. अभिजित वंजारी, प्रशांत धवड, दीपक वानखेडे, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, नितीश ग्वालबंशी, दिनेश यादव, परसराम मानवटकर, देवा उसरे, रमण पैगवार, वासुदेव ढोके, अण्णाजी राऊत, नगरसेविका दर्र्शनी धवड, स्नेहा विवेक निकोसे, भावना लोणारे, रश्मी धुर्वे, नेहा राके श  निकोसे, उज्ज्वला बनकर, हर्षला साबळे, सरस्वती सलामे, अ‍ॅड. रेखा बाराहाते, भोला कुचनकर, अ‍ॅड. अक्षय समर्थ, अ‍ॅड. रवी नायडू, प्रवीण सांदेकर, विनोद नागदेवते, राजभाऊ चिलाटे, सुनील दहीकर, राजेश जमदाळे, भारती कामडी, प्रशांत ढाकणे, मिलिंद सोनटक्के, विलास वाघ, अब्दुल शकीलभाई, रत्नाकर जयपूरकर, अरविंद वानखेडे, डॉं. रामदास सांतगे, ढोंगे काकाजी, जयंता दियेवार, सेवादल अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, चंद्रकांत हिंगे,  नंदा देशमुख, प्रवीण गवरे, मनीष चांदेकर, किशोर  उमाठे, प्रसन्ना जिचकार, पापा ठाकूर, जितेंद्र हावरे, डॉ. मनोहर तांबुलकर, इलमकर गुरुजी, योगेश  देवतळे, कुमार बोरकुटे, कमलेश लारोेकर, युवराज शिव, इरशाद अली, सुरज आवळे, पंकज निघोट, पंकज थोरात, अमित पाठक, वैभव काळे, मंगेश कामोने, पुरुषोत्तम पारमोरे, विशालल वाघमारे, आकाश तायवाडे, विनायक इंगोले, राबर्ट्र वंजारी, राम कळंबे, चंदाभाऊ राऊत, वसीम खान, शाहीद खान, शंकर  उमरेडकर, विजय चिटमिटवार, राजेंद्र नंदनकर, ईश्वर बरडे, निर्मला बोरकर, रोशन बुधवारे, प्रकाश बांते, अंबादास गोंडाणे, सचिन कलनाके, सुशील माटे, चंदू वाकोडीकर, दिनेश तराळे, प्रमोद ठाकूर. मिलिंद दुपारे, राजकुमार कमनानी, युगलकुमार विदावत, निखिल धांडे, बंटी तुरणकर, वसंता बनकरसह मोठ्या संख्येनी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईcongressकाँग्रेस