शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अर्णबविरोधात काँंग्रेस आक्रमक, महाराष्ट्रभरात पोलीस तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 01:13 IST

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देगुन्हेगारी षड्यंत्र, जातीयवादी भावना भडकविणे, अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखलआज उच्च न्यायालयातही खटला दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले. नितीन राऊत यांच्यासह दुग्ध व पशुविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, रामकृष्ण ओझा, बंटी शेळके व इतरांनी नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी विरोधात तक्रार दाखल केली. भादंविच्या कलम ११७, १२० ब, १५३, १५३ अ, २९५ अ, २९८, ५००, ५०४, ५०५ व ५०६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६ अ अंतर्गत अर्णबला त्वरित अटक करण्यात यावी, अशी यावेळी मागणी करण्यात आली.काँग्रेसचे मंत्री व नेत्यांनी झोन दोनच्या उपायुक्त विनिता साहू यांच्याकडे तक्रार सादर केली. या तक्रारीच्या आधारे अर्णब गोस्वामी विरोधात जातीयवादी भावना भडकविणे व बदनामी अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे यांनीदेखील गोस्वामी विरोधात राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालघर सामूहिक हत्याकांडावर अर्णब गोस्वामीने सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे देश व राज्यातील जातीयवादी भावना भडकवून सामाजिक सौहार्द्र बिघडविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे गोस्वामी विरोधात त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जाणार असल्याची माहिती नितीन राऊत, सुनील केदार व सतीश चतुर्वेदी यांनी लोकमतशी बोलताना दिली. यानंतर नितीन राऊत, सुनील केदार, चतुर्वेदी, कुणाल राऊत, बंटी शेळके, अतुल लोंढे, रामकृष्ण ओझा यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व गोस्वामी विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. गृहमंत्र्यांनी पूर्ण प्रकरण सखोलपणे ऐकून घेतले व कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.त्यांच्या तक्रारीवर काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यामुळे गोस्वामी यांचे विशिष्ट समाजाविषयीचे वैर दिसून आले. हा विशिष्ट समाजातील लोकांना इतरांविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न होता. तक्रारकर्ते पुढे म्हणाले आहे की, गोस्वामी यांची कृती काँग्रेस पक्षाची व पक्षाच्या अध्यक्षांची बदनामी करणारी आहे. तसेच, त्यांनी विवेकबुद्धीचा उपयोग व होणाऱ्या परिणामांची चिंता न करता वक्तव्य केले आहे. गोस्वामी यांनी मंगळवारी संबंधित वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हे वक्तव्य केले. परंतु, त्यांनी त्यावर खुलासा केला नाही किंवा माफीही मागितली नाही. अशा वक्तव्यामुळे विविध धार्मिक समूहांमध्ये कटुता, शत्रूत्व, वाईट विचार व द्वेषभावना पसरते. विविध धार्मिक समूहामधील एकोप्याच्या भावनेला नष्ट करणारी ही कृती आहे. अशा कृतीमुळे समाजातील शांतीदेखील भंग होते. पालघर घटनेमध्ये एकही आरोपी अल्पसंख्यक समाजातील नाही, असे त्यांनी सांगितले.भादंविच्या विविध कलमांतर्गत कारवाईची मागणी करताना तक्रारकर्त्यांनी नमूद केले की, गोस्वामी यांनी राज्यघटनेतील मूलतत्त्वावर आघात केला आहे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा संपूर्ण देशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीcongressकाँग्रेस