शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या तारखेवरून गोंधळ, विधानसभेत गदारोळ, भाजपा-विरोधक आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला.राज्य सरकारने शिवजयंतीची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. तर शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करीत असते. त्यामुळे वर्षातून दोनदा शिवजयंती साजरी होते. त्यात आ. हाळवणकर यांनी आज तिसरीच तारीख पुढे केली. शिवरायांचा जन्म ८ एप्रिल १६२७ रोजी झाला असून याला काही संशोधकांच्या संशोधनाचा पुरावा आहे. लोकभावनाही तीच आहे, असे सांगत सरकारने यावर तज्ज्ञांची एक समिती नेमून शिवजयंती एकाच दिवशी साजरी करावी, अशी मागणी हाळवणकर यांनी केली.काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत हाळवणकरांची विधाने कामकाजातून काढण्याची मागणी केली. सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केलेली असताना; आता नव्याने वाद कशाला, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यावर हाळवणकर यांचे हे वैयक्तिक मत असून सरकारची अधिकृत भूमिका नव्हे, असे सांगत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हाळवणकर यांची विधाने कामकाजातून काढण्यास नकार दिला. मात्र, अध्यक्षांच्या या निर्णयाने गोंधळात अधिकच भर पडली. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका मांडली आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा दिला.गदारोळ बघून राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांना शांत करत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने शिवरायांच्या जन्मतिथीबाबत इतिहासतज्ज्ञांची समिती नेमलेली होती. पुढे आघाडी सरकार आल्यानंतर या समितीच्या शिफारशीनुसार १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाने निश्चित केलेली आहे. प्रत्येक मुख्यमंत्री १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन राज्यातील समस्त जनतेच्या वतीने शिवरायांना अभिवादन करीत असतात. यावर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडावी. इथे घोळ निर्माण करू नये, असा सल्ला पवार यांनी दिल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.

टॅग्स :nagpurनागपूर