शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गोवर-रुबेलाच्या‘कन्सेंट’बाबत पालकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:00 IST

गोवर-रुबेला लसीकरणाला बुधवारपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. परंतु या मोहिमेला घेऊन पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे.

ठळक मुद्देअधिकारी म्हणतात, पालकांच्या मंजुरीची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवर-रुबेला लसीकरणाला बुधवारपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. परंतु या मोहिमेला घेऊन पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. इंजेक्शन स्वरूपात ही लस असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अनेक खासगी शाळांनी लस देण्याबाबत पालकांना मंजुरी (कन्सेंट) पत्र भरून देण्याची अट घातल्याने यात आणखी भर पडली आहे. प्राप्त माहितीनुसार अनेक पालकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने ‘कन्सेंट लेटर’ची गरज नाही, वयोगटात बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही लस देण्यात येईल, असे सांगितले आहे.गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मौदा येथे झाला. बुधवार २८ नोव्हेंबरपासून नागपुरात या मोहिमेचा शुभारंभ होऊन लसीकरणाला सुरुवात होणार आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १० लाख ६१ हजार ६७२ लाभार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. यात नागपुरातील ४,२१,४०८ शाळेतील मुले व ६२,७१६ अंगणवाडीतील मुलांचा समावेश आहे. महिन्याच्या ३० दिवसांत १५ दिवस शाळा तर १५ दिवस वसाहतींमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. दररोज एका शाळेच्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल. ही लस सुरक्षित असून पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागने केले आहे. या लसीकरणाला पालकांची ना नाही, परंतु त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारा सक्षम अधिकारी पुढे येत नसल्याने व जबाबदारी कुणी घेत नसल्याने पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. यातच खासगी शाळांनी लसीकरणाला पूर्णत: जबाबदार पालक राहणार, अशा स्वरूपातील ‘कन्सेंट लेटर’ लिहून घेणे सुरू केल्याने गोंधळ वाढला आहे.

कन्सेंट लेटर मागितले नाहीसर्व शाळांना गोवर-रुबेला लसीकरणाची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. पालकांकडून कन्सेंट लेटर भरून घ्या, अशा सूचना शाळांना दिल्या नाहीत.-चिंतामण वंजारी,शिक्षण अधिकारी (प्राथमिक)

लसीकरण सुरक्षित९ ते १५ वयोगटातील मुलांना देणारे गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. प्रत्येकाने आपल्या मुलाला ही लस द्यावी. लसीकरण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात अनुभवी व प्रशिक्षण प्राप्त परिचारिकांकडून केले जाईल. लस दोषमुक्त आहे. विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्याला लस दिल्यानंतर तेच इंजेक्शन दुसºयाला देता येणार नाही, अशी सोय आहे.-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर

लसीकरण का?गोवरमुळे भारतात दरवर्षी ५० हजार जण मृत्युमुखी पडतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील ‘अ जीवनसत्वा’चे प्रमाण खूप कमी होते. रुबेला हा गर्भवती मातेला झाल्यास तिचा गर्भपात होऊ शकतो. बालकास मोतिबिंदू, हृदयविकार, मतिमंदत्व, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे आदी आजार होऊ शकतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य