शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

भूगर्भातील हालचालींनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 07:00 IST

जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर सायंकाळच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, ही साधारण प्रक्रिया असून चिंतेचे कुठलेही कारण नाही. शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.२३ जून रोजी अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलमध्ये तीव्रता ३.३ इतकी नोंदविली गेली. याच महिन्यात २ तारखेलासुद्धा ३.४ तीव्रता असलेल्या भूकंपाची नोंद झाली. विशेष म्हणजे १० जून रोजी मुंबईच्या पश्चिमेकडे ७८ किमी दूर ३.० तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली, तर गुजरातच्या राजकोट येथे १४ जूनला ५.३, १५ जूनला दोनदा ४.१ व ३.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

भूगर्भ सर्वेक्षण विभागा(जीएसआय)चे नागपूरचे संचालक विशाल साखरे यांच्या मते, या तीव्रतेच्या भूकंपामुळे कुठलाही धोका नाही. तीव्रता ६ किंवा ७ च्या वर असेल तर चिंतेचे कारण ठरू शकते. ही भूगर्भात होणारी साधारण प्रक्रिया आहे. भूगर्भातील खडकांच्या हालचालीतून फॉल्ट रिअ‍ॅक्शन झाल्याने ऊर्जा बाहेर आली व त्यामुळे हे धक्के जाणवले. पण पृथ्वीच्या आवरणात मोठा बदल जाणवत नसून हे मोठ्या भूकंपाला कारणीभूत नाहीत, असा दावा त्यांनी केला. हे धक्के प्राथमिक तरंगातून निर्माण झाले आहेत, जे सामान्य असतात. सेकंडरी आणि सरफेस तरंग धोकादायक ठरतात; पण असे तरंग निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. हो पण सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र नाही भूकंपप्रवणजीएसआयच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राची भूमी कुठल्याच अंगाने भूकंपप्रवण नाही. केवळ कोयना पात्राच्या भागात थोड्या फार हालचाली होत असतात. त्यामुळे १९९३ साली लातूर, किल्लारीला भूकंप आला होता. उर्वरित कुठेही अशी शक्यता नाही. याशिवाय जवळ असलेल्या गुजरातच्या कच्छचा प्रदेश भूकंपप्रवण आहे. देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्य हे भूकंपप्रवण परिसरात येतात. मात्र या काही वर्षांत मोठा आघात झाला नाही, असे विशाल साखरे यांनी सांगितले. भूगर्भातील ऊर्जा बाहेर पडल्याने हा प्रकार घडला असून ही सामान्य बाब आहे. जीएसआयचे भूगर्भशास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र नागरिकांनी सतर्कता ठेवावी आणि सुरक्षेचे नियम अंगिकरावेत. आपत्ती निवारण दलानेही याबाबत जनजागृती करावी.- विशाल साखरे, संचालक, जीएसआय, नागपूर

 

टॅग्स :Earthquakeभूकंप