शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

स्क्रब टायफसवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:55 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देअस्वच्छतेत वाढ : नगरसेवकांना विचारले तुम्ही काय करताय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पूनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, आग्रे यांच्या वकील अ‍ॅड. सेजल लाखाणी यांनी कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याचे सांगितले तसेच अस्वच्छतेमुळे डासांची संख्या व विविध आजार वाढल्याचा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने गेल्या काही महिन्यांत अनेकांचे प्राण घेणाऱ्या स्क्रब टायफस आजाराचा उल्लेख केला. अस्वच्छता अशा अनेक आजारांचे मूळ कारण आहे. स्थानिक प्रशासनासह नगरसेवकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. शहरातील नगरसेवक याकरिता काय करीत आहेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला व नगरसेवकांना यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. जैविक व अजैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्या जात नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHealthआरोग्य