शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

बीव्हीजीने रुजविली सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना : हनमंतराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:20 IST

व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देझुंजा आणि झुंजत पुढे जा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.१६ व्या जागतिक मराठी संमेलनात हनमंतराव गायकवाड यांची प्रकट मुलाखत शनिवारी झाली. संपादक गजानन निमदेव व सचिन इटकर यांनी गायकवाड यांना विविध विषयांवर बोलते केले. रेहमतपूर ते लंडन व्हाया पुणे असा प्रवास कसा झाला, या प्रश्नावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, परिस्थिती हलाखीची होती. हुशार असल्यामुळे आईवडील साताऱ्याला घेऊन आले. त्यांचे कष्ट डोळ्यापुढे होते. वयाच्या १४ व्या वर्षी संकल्प केला. १८ व्या वर्षी प्रतिष्ठानची स्थापना केली. टेल्को कंपनीत कार्यरत असताना, स्वत:साठी काम करण्याचा निर्धार केला. ८ लोकांपासून सुरू झालेल्या बीव्हीजीत आज देशभरातील ८० हजार तरुण तरुणी कार्यरत आहे. हे सर्व सहज शक्य झाले नाही. त्यासाठी झुंजावे लागले आणि झुंजत पुढे जावे लागले.बेरोजगारीच्या प्रश्नासोबतच बीव्हीजीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू केले आहे. विषमुक्त शेती आणि विकसित भारत या संकल्पनेवर कार्यरत बीव्हीजीने एका वर्षात ३० हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून शेतीचा खर्च कमी केला आहे. येणाऱ्या काही वर्षात १० कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तनाचा ध्यास बीव्हीजीने घेतला आहे.आरोग्याच्या क्षेत्रात बीव्हीजीने सुरू केलेल्या आपात्कालीन सेवेचा १०८ क्रमांक प्रत्येकाचा तोंडपाठ आहे. ३५ लाख लोकांना त्याचा लाभ झाला आहे. ३० हजार बाळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये जन्माला आले आहे. मुंबईत सुरू केलेली बाईक अ‍ॅम्ब्युलन्सही वेगाने सेवा देत आहे. २० हजार लोकांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने मदत केली आहे.

 जयपूरला आणले टॉप १० मध्ये जयपूरच्या चौकाचौकात कचऱ्याचे ढिगारे पडून असायचे. ४० लाख लोकसंख्येच्या या शहराच्या स्वच्छतेचे काम बीव्हीजीला मिळाले. आज स्वच्छ सर्वेक्षणात हे शहर २४० वरून टॉप १० मध्ये आले.  संधी भरपूर आहेतरुणाईने आपल्याला काय जमते याचा शोध घेतला पाहिजे. चांगल्या कल्पना निवडल्या पाहिजे. सोबतच चांगले साथीदार शोधले पाहिजे.  जग हे मार्केट झाले आहे. तरुणाईने ज्ञान व आत्मविश्वास वाढविण्यास भरपूर संधी असल्याचे गायकवाड म्हणाले. 

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर