शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीव्हीजीने रुजविली सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना : हनमंतराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:20 IST

व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देझुंजा आणि झुंजत पुढे जा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.१६ व्या जागतिक मराठी संमेलनात हनमंतराव गायकवाड यांची प्रकट मुलाखत शनिवारी झाली. संपादक गजानन निमदेव व सचिन इटकर यांनी गायकवाड यांना विविध विषयांवर बोलते केले. रेहमतपूर ते लंडन व्हाया पुणे असा प्रवास कसा झाला, या प्रश्नावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, परिस्थिती हलाखीची होती. हुशार असल्यामुळे आईवडील साताऱ्याला घेऊन आले. त्यांचे कष्ट डोळ्यापुढे होते. वयाच्या १४ व्या वर्षी संकल्प केला. १८ व्या वर्षी प्रतिष्ठानची स्थापना केली. टेल्को कंपनीत कार्यरत असताना, स्वत:साठी काम करण्याचा निर्धार केला. ८ लोकांपासून सुरू झालेल्या बीव्हीजीत आज देशभरातील ८० हजार तरुण तरुणी कार्यरत आहे. हे सर्व सहज शक्य झाले नाही. त्यासाठी झुंजावे लागले आणि झुंजत पुढे जावे लागले.बेरोजगारीच्या प्रश्नासोबतच बीव्हीजीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू केले आहे. विषमुक्त शेती आणि विकसित भारत या संकल्पनेवर कार्यरत बीव्हीजीने एका वर्षात ३० हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून शेतीचा खर्च कमी केला आहे. येणाऱ्या काही वर्षात १० कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तनाचा ध्यास बीव्हीजीने घेतला आहे.आरोग्याच्या क्षेत्रात बीव्हीजीने सुरू केलेल्या आपात्कालीन सेवेचा १०८ क्रमांक प्रत्येकाचा तोंडपाठ आहे. ३५ लाख लोकांना त्याचा लाभ झाला आहे. ३० हजार बाळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये जन्माला आले आहे. मुंबईत सुरू केलेली बाईक अ‍ॅम्ब्युलन्सही वेगाने सेवा देत आहे. २० हजार लोकांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने मदत केली आहे.

 जयपूरला आणले टॉप १० मध्ये जयपूरच्या चौकाचौकात कचऱ्याचे ढिगारे पडून असायचे. ४० लाख लोकसंख्येच्या या शहराच्या स्वच्छतेचे काम बीव्हीजीला मिळाले. आज स्वच्छ सर्वेक्षणात हे शहर २४० वरून टॉप १० मध्ये आले.  संधी भरपूर आहेतरुणाईने आपल्याला काय जमते याचा शोध घेतला पाहिजे. चांगल्या कल्पना निवडल्या पाहिजे. सोबतच चांगले साथीदार शोधले पाहिजे.  जग हे मार्केट झाले आहे. तरुणाईने ज्ञान व आत्मविश्वास वाढविण्यास भरपूर संधी असल्याचे गायकवाड म्हणाले. 

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर