शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बीव्हीजीने रुजविली सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना : हनमंतराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:20 IST

व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देझुंजा आणि झुंजत पुढे जा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.१६ व्या जागतिक मराठी संमेलनात हनमंतराव गायकवाड यांची प्रकट मुलाखत शनिवारी झाली. संपादक गजानन निमदेव व सचिन इटकर यांनी गायकवाड यांना विविध विषयांवर बोलते केले. रेहमतपूर ते लंडन व्हाया पुणे असा प्रवास कसा झाला, या प्रश्नावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, परिस्थिती हलाखीची होती. हुशार असल्यामुळे आईवडील साताऱ्याला घेऊन आले. त्यांचे कष्ट डोळ्यापुढे होते. वयाच्या १४ व्या वर्षी संकल्प केला. १८ व्या वर्षी प्रतिष्ठानची स्थापना केली. टेल्को कंपनीत कार्यरत असताना, स्वत:साठी काम करण्याचा निर्धार केला. ८ लोकांपासून सुरू झालेल्या बीव्हीजीत आज देशभरातील ८० हजार तरुण तरुणी कार्यरत आहे. हे सर्व सहज शक्य झाले नाही. त्यासाठी झुंजावे लागले आणि झुंजत पुढे जावे लागले.बेरोजगारीच्या प्रश्नासोबतच बीव्हीजीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू केले आहे. विषमुक्त शेती आणि विकसित भारत या संकल्पनेवर कार्यरत बीव्हीजीने एका वर्षात ३० हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून शेतीचा खर्च कमी केला आहे. येणाऱ्या काही वर्षात १० कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तनाचा ध्यास बीव्हीजीने घेतला आहे.आरोग्याच्या क्षेत्रात बीव्हीजीने सुरू केलेल्या आपात्कालीन सेवेचा १०८ क्रमांक प्रत्येकाचा तोंडपाठ आहे. ३५ लाख लोकांना त्याचा लाभ झाला आहे. ३० हजार बाळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये जन्माला आले आहे. मुंबईत सुरू केलेली बाईक अ‍ॅम्ब्युलन्सही वेगाने सेवा देत आहे. २० हजार लोकांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने मदत केली आहे.

 जयपूरला आणले टॉप १० मध्ये जयपूरच्या चौकाचौकात कचऱ्याचे ढिगारे पडून असायचे. ४० लाख लोकसंख्येच्या या शहराच्या स्वच्छतेचे काम बीव्हीजीला मिळाले. आज स्वच्छ सर्वेक्षणात हे शहर २४० वरून टॉप १० मध्ये आले.  संधी भरपूर आहेतरुणाईने आपल्याला काय जमते याचा शोध घेतला पाहिजे. चांगल्या कल्पना निवडल्या पाहिजे. सोबतच चांगले साथीदार शोधले पाहिजे.  जग हे मार्केट झाले आहे. तरुणाईने ज्ञान व आत्मविश्वास वाढविण्यास भरपूर संधी असल्याचे गायकवाड म्हणाले. 

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर