शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेज हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:55 IST

कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. येणारा काळ हा अडचणींचा असू शकतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनादेखील पत्र लिहिण्यात आले आहे.

ठळक मुद्देभारतीय मजदूर संघाची मागणी : पंतप्रधानांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. येणारा काळ हा अडचणींचा असू शकतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनादेखील पत्र लिहिण्यात आले आहे.लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम पडणार हे जाणून घेण्यासाठी आर्थिक व्यवहाराचे दोन भागात वर्गीकरण करावे लागेल. पहिला प्रकार म्हणजे दैनंदिन गरजांशी संबंधित असून यावर लॉकडाऊनचा आंशिक परिणाम झाला आहे. दुसऱ्या प्रकारात मात्र लॉकडाऊनमध्ये हे उद्योग पूर्णत: बंद आहेत. थोडक्यात, दोन्ही प्रकारांतील क्षेत्र प्रभावित झाले असल्याने यावर उपायदेखील वेगवेगळे योजावे लागतील. औषध उद्योग, ऊर्जा क्षेत्र, टेलिकॉम क्षेत्र, कृ षी क्षेत्र यांना झळ पोहोचली आहे. शेतमजुरांची गैरहजेरी तर पुढील अनÞेक महिने जाणवणार आहे. बँकिंग क्षेत्रासमोर एनपीएचे संकट उभे ठाकणार आहे. पेट्रोलियम व हवाई क्षेत्रासाठीदेखील कठीण दिवस आहेत. साडेसात कोटी सूक्ष्म-लघु व उद्योग बंद पडण्याची भीती आहे.लॉकडाऊनचा तडाखा बसलेल्या सर्वच क्षेत्रांना प्रथम दिलासा मिळेल असे आर्थिक उपाय तातडीने योजण्याची नितांत गरज आहे. त्यानंतर काही विशेष क्षेत्रांपुढील आव्हाने व समस्यांचा विचार करून त्याबाबत उपाययोजना करावी लागेल. लघु व मध्यम उद्योग उत्पादनाला तीन वर्षांची बाजार गॅरंटी देण्यात यावी. कापड व हातमाग उद्योगालादेखील कच्च्या मालाचा पुरवठा झाला पाहिजे. रेल्वेला अधिक भक्कम पाठबळ दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर पडणाºया नकारात्मक प्रभावाला कमी करता येईल. वेज सबसिडी, टॅक्स हॉलिडे (करामध्ये सूट किंवा कर अवकाश) जीएसटीसंबंधित प्रलंबित देयके, लोन मोरेटोरियमचा कालावधी वाढविण्यात यावा. करपद्धती न्यायसंगत बनविण्यात यावी, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्थलांतरितांसाठी धोरण तयार करावेलॉकडाऊनमध्ये जे मजूर आपापल्या राज्यात गेले आहेत, त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी केंद्रीय कामगार विभागाच्या डाटा बँकचा उपयोग करता येऊ शकेल. सरकारने प्रवासी स्थलांतरितांसाठी एक कायम धोरण तयार करण्याची वेळ आज आली आहे, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली असल्याची माहिती विदर्भ प्रसिद्धिप्रमुख सुरेश चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी