शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेज हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:55 IST

कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. येणारा काळ हा अडचणींचा असू शकतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनादेखील पत्र लिहिण्यात आले आहे.

ठळक मुद्देभारतीय मजदूर संघाची मागणी : पंतप्रधानांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. येणारा काळ हा अडचणींचा असू शकतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनादेखील पत्र लिहिण्यात आले आहे.लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम पडणार हे जाणून घेण्यासाठी आर्थिक व्यवहाराचे दोन भागात वर्गीकरण करावे लागेल. पहिला प्रकार म्हणजे दैनंदिन गरजांशी संबंधित असून यावर लॉकडाऊनचा आंशिक परिणाम झाला आहे. दुसऱ्या प्रकारात मात्र लॉकडाऊनमध्ये हे उद्योग पूर्णत: बंद आहेत. थोडक्यात, दोन्ही प्रकारांतील क्षेत्र प्रभावित झाले असल्याने यावर उपायदेखील वेगवेगळे योजावे लागतील. औषध उद्योग, ऊर्जा क्षेत्र, टेलिकॉम क्षेत्र, कृ षी क्षेत्र यांना झळ पोहोचली आहे. शेतमजुरांची गैरहजेरी तर पुढील अनÞेक महिने जाणवणार आहे. बँकिंग क्षेत्रासमोर एनपीएचे संकट उभे ठाकणार आहे. पेट्रोलियम व हवाई क्षेत्रासाठीदेखील कठीण दिवस आहेत. साडेसात कोटी सूक्ष्म-लघु व उद्योग बंद पडण्याची भीती आहे.लॉकडाऊनचा तडाखा बसलेल्या सर्वच क्षेत्रांना प्रथम दिलासा मिळेल असे आर्थिक उपाय तातडीने योजण्याची नितांत गरज आहे. त्यानंतर काही विशेष क्षेत्रांपुढील आव्हाने व समस्यांचा विचार करून त्याबाबत उपाययोजना करावी लागेल. लघु व मध्यम उद्योग उत्पादनाला तीन वर्षांची बाजार गॅरंटी देण्यात यावी. कापड व हातमाग उद्योगालादेखील कच्च्या मालाचा पुरवठा झाला पाहिजे. रेल्वेला अधिक भक्कम पाठबळ दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर पडणाºया नकारात्मक प्रभावाला कमी करता येईल. वेज सबसिडी, टॅक्स हॉलिडे (करामध्ये सूट किंवा कर अवकाश) जीएसटीसंबंधित प्रलंबित देयके, लोन मोरेटोरियमचा कालावधी वाढविण्यात यावा. करपद्धती न्यायसंगत बनविण्यात यावी, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्थलांतरितांसाठी धोरण तयार करावेलॉकडाऊनमध्ये जे मजूर आपापल्या राज्यात गेले आहेत, त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी केंद्रीय कामगार विभागाच्या डाटा बँकचा उपयोग करता येऊ शकेल. सरकारने प्रवासी स्थलांतरितांसाठी एक कायम धोरण तयार करण्याची वेळ आज आली आहे, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली असल्याची माहिती विदर्भ प्रसिद्धिप्रमुख सुरेश चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी