शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांच्या भूमिकेवर नागपुरातील वकिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:42 IST

चार न्यायाधीशांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी मांडलेले मुद्दे याबाबत लोकमतने नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञांना नेमके काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही वकीलांनी न्यायाधीशांनी घेतलेली भूमिका गंभीर असल्याचे म्हटले तर काहींनी ही पद्धत चुकल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकाही तरी गंभीर, पण पद्धत चुकली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीश हे प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलले. केवळ बोललेच नाही तर सर्वोच्च न्यायालयातील चार वर्तमान न्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेत सुरू असलेला गैरकारभार चव्हाट्यावर आणला. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर देशातील विधिवर्तुळात वादळ उठले. या चार न्यायाधीशांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी मांडलेले मुद्दे याबाबत लोकमतने नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञांना नेमके काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही वकीलांनी न्यायाधीशांनी घेतलेली भूमिका गंभीर असल्याचे म्हटले तर काहींनी ही पद्धत चुकल्याचे सांगितले.असे व्हायला नको होतेजे झाले ते अतिशय दु:खदायक आणि वेदना देणारी घटना आहे. असे व्हायला नको होते.-न्या. विकास सिरपूरकर, माजी न्यायाधीश,सर्वोच्च न्यायालय

देशासाठी चांगले नाहीही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आज देशात जी परिस्थिती आहे ती चांगली नाही. लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. पहिला स्तंभ संसद, याने काम करणे बंद केले आहे. दुसरा कार्यपालिका. त्यात सामूहिकतेची कमतरता आहे. आणि तिसरा स्तंभ म्हणजे न्यायापालिका. आज सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ते देशासाठी ठीक नाही. अशामुळे देश अराजकतेच्या दिशेने जाईल.- अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, वरिष्ठ वकील, हायकोर्ट

जे झाले ते दुर्दैवीजी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे.अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारीवरिष्ठ वकील, हायकोर्टआपसात सोडवता येऊ शकतेजी घटना घडली ती अतिशय दुर्देवी आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना काही तक्रार होती तर त्यांनी मुख्य न्यायाधीशांसोबत चर्चा करून सोडवली असती तर चांगले झाले असते. देशाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.-अ‍ॅड. राजेंद्र डागा, वरिष्ठ वकील, हायकोर्ट

काहीतरी गंभीर नक्कीच 

न्यायाधीश प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलले, ही ऐतिहासिक घटना नक्कीच आहे. आजवर असे कधी झाले नव्हते. सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायाधीशांना प्रसार माध्यमांसमोर येऊन आपले म्हणणे मांडावे लागत असेल तर न्यायव्यवस्थेत काहीतरी गंभीर नक्कीच घडले असावे. त्यांनी हा प्रश्न ‘इंटरनल मेकॅनिझम’द्वारे सोडवण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते त्यांनी नक्की केले असेलच. परंतु असे असले तरी न्यायव्यवस्थेचे नाव खराब होऊ नये म्हणून हा प्रश्न ‘इंटरनल मेकॅनिझम’द्वारेच सोडवायला हवा.

-विजय कोल्हे , माजी मुख्य जिल्हा सरकारी वकील

देशाच्या हिताची भूमिका, चौकशी व्हावीइतक्या वरिष्ठ न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील तर त्याची चौकशी निश्चितच व्हायला हवी. एक नव्हे तर चार न्यायाधीशांनी मुद्दे उपस्थित केले आहेत. यामुळे न्यायव्यवस्थेचे नुकसान झालेले नाही, उलट देशाच्या हिताच्या दृष्टीने घेतलेली ही भूमिका आहे. एकूणच समाजाच्या होत असलेल्या नुकसानीवर, लोकशाहीवर या न्यायाधीशांनी बोट ठेवले आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीत संशय राहू नये. कारणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी याची सखोल चौकशी व्हावी.- अ‍ॅड. सत्यनाथन, वरिष्ठ वकील

चौकशी व्हावी, पण पद्धत चुकलीसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची चौकशी झालीच पाहिजे. परंतु न्यायाधीशांनी हे मुद्दे मांडण्यासाठी जी पद्धत निवडली ती मला व्यक्तिगतरीत्या योग्य वाटत नाही. न्यायाधीशांनी थेट प्रसार माध्यमांसमोर येऊन हे प्रश्न मांडण्याअगोदर राष्ट्रपतींसमोरही मांडता आले असते. लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायाधीशांनी थेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे प्रश्न मांडल्यामुळे लोकांना न्यायव्यवस्थेवरही संशय निर्माण होईल.-नितीन तेलगोटे, मुख्य जिल्हा सरकारी वकील

लोकशाहीसाठी धोकाआज सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी जे व्यासपीठ निवडले, ते योग्य नाही. त्यांनी असे करायला नको होते. याची समीक्षा करण्यात यावी. सरकारने यावर अधिक लक्ष द्यायला हवे. न्यायापालिकेवर कुणी दबाव टाकत असेल तर ते योग्य नाही. न्यायपालिका स्वतंत्र आहे. त्याचे कार्यही स्वतंत्र असायला हवे.-अ‍ॅड. आसिफ कुरैशी, माजी अध्यक्ष बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवा

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय