शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 21:32 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार आहे. कारण यासंदर्भात राज्यपाल व कुलपती, उच्च व तंत्र शिक्षा निदेशालयाचे निदेशक व गृह विभागाला तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हंगामामुळे वाढला वाद राज्यपाल व कुलपती यांच्याकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार आहे. कारण यासंदर्भात राज्यपाल व कुलपती, उच्च व तंत्र शिक्षा निदेशालयाचे निदेशक व गृह विभागाला तक्रार करण्यात आली आहे.डॉ. अभिषेक हरदास यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे की, विद्यापीठाच्या झालेल्या तोडफोडीसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात यावे. तोडफोडीच्या घटनेनंतर विद्यापीठाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक संपत्तीच्या झालेल्या नुकसानापोटी भरपाई ही कुलगुरू यांच्याकडून वसूल करण्यात यावी. या तक्रारीत महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टचा हवाला देत स्पष्ट केले की, विद्यापीठाला ४५ दिवसाच्या आत निकाल घोषित करणे गरजेचे आहे. वेळेत निकाल घोषित करू न शकल्यास त्याची माहिती राज्यपाल व कुलपती यांना देणे गरजेचे आहे. पण विद्यापीठ प्रशासनाने अशी कुठलीही माहिती राजभवनला दिलेली नाही. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तक्रार न करता, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. विद्यापीठाची भूमिका लक्षात घेता, राज्य सरकारने तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. कुलगुरु यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी. शुक्रवारी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी बी-कॉम अभ्यासक्रमाच्या निकालावरून विद्यापीठात निदर्शने केली होती. या दरम्यान जोरदार तोडफोड करण्यात आली होती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी