शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

रेल्वे अपघातात आठ लाखाची भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 20:16 IST

रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा पीडितांना दिलासा : मध्य रेल्वेचे अपील खारीज

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.मनोज पातोडे असे मयत तरुणाचे नाव असून तो नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथील रहिवासी होता. २ एप्रिल २००९ रोजी रेल्वे दावा न्यायाधीकरणने मनोजचे पालक मधुकर व कांताबाई यांना चार लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाविरुद्ध मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, रेल्वेचे अपील फेटाळून लावले व २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई वाढवून आठ लाख रुपये केली. पीडितांना उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी रेल्वेला आठ आठवड्याची मुदत देण्यात आली. ही घटना १७ जानेवारी २००५ रोजी घडली होती. भुसावळ-वर्धा पॅसेंजरने प्रवास करीत असताना मनोज तळणी रेल्वेस्थानकावर रेल्वेतून खाली पडला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. न्यायालयात रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट तर, पातोडेतर्फे अ‍ॅड. अनिल बांबल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वे