शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मृताकडे तिकीट न सापडल्यासही भरपाई देणे बंधनकारक : हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 21:00 IST

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघाताचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेअपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.वरुड, जि. वर्धा येथील संतोष देवतळे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पंचनाम्यात त्यांच्याजवळ रेल्वे प्रवासाचे अधिकृत तिकीट आढळून आले नाही. त्यामुळे रेल्वे दावा न्यायाधिकरणने वारसदार पत्नी रंजना, मुले रोहित, आदित्य व आई अनसूया यांना भरपाई नाकारली होती. त्यामुळे या वारसदारांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून रेल्वे न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे सुधारित निर्वाळा देऊन वारसदारांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला. १५ ऑगस्ट २०१६ रोजी संतोष हा रेल्वेने नागपूर येथून सेवाग्रामला परत जात होता. त्याने या प्रवासाचे अधिकृत तिकीट खरेदी केले होते. रेल्वे सेवाग्रामला पोहचल्यानंतर संतोष खाली पडला. या दुर्दैवी घटनेमुळे त्याचा मृत्यू झाला. रेल्वे न्यायाधिकरणने वारसदारांचा भरपाईचा अर्ज ३१ डिसेंबर २०१८ रोजी फेटाळला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वेAccidentअपघात