शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

‘कॉमन मॅन’चा प्रेरणास्रोत हरवला

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

प्रसिद्ध व्यगंचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने नागपुरातील त्यांच्या शिष्य परिवारातही शोककळा पसरली आहे. त्यांनी घडविलेले अनेक व्यंगचित्रकार सध्या विविध ठिकाणी व्यंगचित्रातून सामाजिक

उपराजधानीतील व्यंगचित्रकारांची प्रतिक्रियानागपूर: प्रसिद्ध व्यगंचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने नागपुरातील त्यांच्या शिष्य परिवारातही शोककळा पसरली आहे. त्यांनी घडविलेले अनेक व्यंगचित्रकार सध्या विविध ठिकाणी व्यंगचित्रातून सामाजिक भाष्य करीत आहे. चालती बोलती कार्यशाळाच - संजय मोरे आमचे मित्र कैलास भिंगारे यांनी मुंबईत व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्यासह मलाही संधी लाभली होती. त्यावेळीच त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि तीन दिवस त्यांच्या सहवासात घालविता आले. यानिमित्ताने व्यंगचित्रकार केवळ व्यंगचित्रकार नसतो तर तो समाजाचा भाष्यकारही असतो. त्यामुळे व्यंगचित्रकाराची जबाबदारी फार मोठी असल्याचे ते म्हणाले होते. मी त्यांच्यापेक्षा लहान असूनही त्यांनी माझ्याशी संवाद साधून मला खूप काही सांगितले. प्रोत्साहन दिले. अत्यंत निगर्वीपणे वागणारे आर. के. म्हणजे चालती - बोलती कार्यशाळाच होती. त्यांची कॉपी करूनच मी या क्षेत्रात प्रारंभ केला. मे महिन्यात त्यांच्या प्रदर्शनाचे पुन्हा आयोजन करण्यात आले होते पण त्यापूर्वीच त्यांनी निरोप घेतला. विविध स्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी केलेले भाष्य नेहमीच प्रेरणा देत राहिल, असे व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी सांगितले. घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहणारे कलावंत -चारोळेएखादी घटना दिसते तसे सारेच सत्य नसते. त्याचे अनेक अंडरकरंट असतात. ते शोधले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचा, राजकीय स्थितीचा अभ्यास असला पाहिजे, हे आर. के. लक्ष्मण यांच्याकडूनच शिकलो. १५ वर्षांपूर्वी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्टुनिस्ट सेमीनार झाले होते. त्यावेळी ते नागपुरात आले होते. तेव्हा त्यांच्याकडून बऱ्याच बाबी शिकता आल्या. त्यावेळी मी विद्यार्थी असल्याने कार्टुनिस्ट व्हायचे, हे ठरवले नव्हते पण त्यांच्यामुळेच या क्षेत्रात मी आलो. सामाजिक विषयावर चित्रांच्या माध्यमातून भाष्य करण्याची आणि कॉमन मॅनची भावना नेमकेपणाने पकडण्याची त्यांची हातोटी वादातीत होती. त्यांच्या निधनाने फार मोठा मार्गदर्शक आणि भाष्यकार हरविल्याचे दु:ख वाटते, अशी संवेदना व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी व्यक्त केली. एकाग्रतेने काम करणारा कलावंत -अकोलवारआर. के. लक्ष्मण माझे चांगले मित्र होते. अनेक वर्षे त्यांच्यासह काम करण्याचा अनुभव घेता आला. सातत्याने आमच्या भेटी व्हायच्या आणि त्यांचे विचार समजून घेता यायचे. ते व्यंगचित्र काढत असताना कुणी गप्पा मारलेल्या त्यांना अजिबात चालत नव्हत्या. कारण त्यामुळे आपली एकाग्रता भंग होते आणि जो परिणाम साधायचा तो साधता येत नाही, असे त्यांचे मत होते. कामाप्रती अतिशय गंभीर असणारा हा कलावंत होता. धनवटे रंगमंदिरात त्यांचा आणि माझा एक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे नावही ‘कॉमन मॅन’ असेच होते. त्यावेळी धनवटेला प्रचंड गर्दी झाली. मी आणि त्यांनी काही सादरीकरण केले. त्यात त्यांचे स्ट्रोक्स जबरदस्त परिणामकारक होते. त्यांच्यासारखा कावळा तर आतापर्यंत कुणी चितारू शकले नाही. प्रतिकांचा योग्य उपयोग ते व्यंगचित्रातून करायचे. नागपूर पत्रकार भवनातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांचे बाळासाहेब ठाकरेंशी जवळचे संबंध होते. चांगला कार्टुनिस्ट असताना त्यांनी राजकीय पक्ष काढल्याचा त्यांना राग आला पण त्यांची मैत्री कायम होती. त्यांच्या निधनाने एक मोठा मित्र हरविल्याचे दु:ख आहे, अशी शोकसंवेदना ज्येष्ठ व्यंगचित्रकार विष्णू अकोलवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)