शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

सिंचन घोटाळ्यात आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:31 IST

विदर्भातल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आर्थिक व चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला.

ठळक मुद्देहायकोर्टाने राखून ठेवला निर्णय : याचिकाकर्ते सकारात्मक, प्रतिवादींनी केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आर्थिक व चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला.याचिकाकर्त्यांचे वकील फिरदोस मिर्झा व श्रीधर पुरोहित यांनी समिती स्थापन करण्याच्या आवश्यकतेवर भर देऊन यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय सादर केले. प्रतिवादी राज्य सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता प्रसाद ढाकेफाळकर तर, माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता अनिल साखरे यांनी बाजू मांडताना समिती स्थापन करण्यास विरोध केला. समिती स्थापन केल्यास अधिकाऱ्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण होईल असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या मुद्यावर निर्णय देण्यासाठी २ आॅगस्ट ही तारीख निश्चित केली. न्यायालयाचा निर्णय सकारात्मक आल्यास, त्यानंतर समितीची रचना, कार्यक्षेत्र, अधिकार इत्यादीबाबत पुढील निर्देश दिल्या जातील.गैरव्यवहाराच्या चौकशीस विलंब झाल्यास आरोपी सरकारी कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमाचा फायदा मिळतो. आरोपी सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध, तो सेवानिवृत्त झाल्यावर, चार वर्षांवरपूर्वीच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येणार नाही अशी तरतूद या नियमात आहे. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत विविध विभागांमधील ३२६ गैरव्यवहार प्रकरणांतील ५९८ आरोपी कर्मचारी या तरतुदीचा लाभ मिळून कारवाईच्या कक्षेतून बाहेर गेले आहेत. तसेच, कोणत्याही गैरव्यवहारामुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. लोकशाहीच्या सुदृढतेसाठी हे नुकसान जबाबदार व्यक्तींकडून भरून काढणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने या बाबी लक्षात घेता दोन्ही बाबतीत जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित करून याचिकाकर्ते व प्रतिवादींच्या वकिलांना यावर युक्तीवाद करण्यास सांगितले होते. विदर्भातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात अतुल जगताप यांच्या चार तर, जनमंच या सामाजिक संस्थेची एक जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प