शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

येणारा काळ भारताच्या आर्थिक प्रगतीचा : आर. मुकुंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:03 IST

गेल्या काही काळापासून जगामध्ये भारताबाबत आकर्षण वाढत आहे. देशातील ‘टॅलेन्ट’मुळे उद्योगक्षेत्राची पावले इकडे वळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कालावधीपेक्षा मागील दहा वर्षांत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून आठ वर्षात अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरचा निश्चित टप्पा गाठेल, असे मत टाटा केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व ‘सीईओ’ रामकृष्णन मुकुंदन यांनी व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १४व्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’चा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात पडला पार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून जगामध्ये भारताबाबत आकर्षण वाढत आहे. देशातील ‘टॅलेन्ट’मुळे उद्योगक्षेत्राची पावले इकडे वळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कालावधीपेक्षा मागील दहा वर्षांत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून आठ वर्षात अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरचा निश्चित टप्पा गाठेल, असे मत टाटा केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व ‘सीईओ’ रामकृष्णन मुकुंदन यांनी व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १४व्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.‘व्हीएनआयटी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ.प्रमोद पडोळे, कुलसचिव डॉ.एस.आर.साठे व निरनिराळ्या शाखांचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते. मी ३० वर्षांअगोदर अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली तेव्हा अनेक सहकारी विदेशात नोकरीसाठी गेले. मात्र मी देशातच राहून काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मनात शंका होती, मात्र निर्णय बरोबर ठरला. येणारा काळ भारताच्या प्रगतीचा असून उद्योगक्षेत्राची यात मौलिक भूमिका राहणार आहे. ऊर्जा, संशोधन, औद्योगिकीकरण, कृषी आणि सर्वच क्षेत्रात आपणास आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांनी देशात राहून काम करण्यावर भर दिला पाहिजे. विदेशात जाऊन चांगल्या पगाराची नोकरी कधीही मिळू शकते. मात्र भारतात राहून देशाला प्रगतीकडे नेण्याचे सारथ्य करण्याची संधी तुमच्यासमोर आहे व त्याचे समाधान वेगळेच राहणार आहे, असे आर.मुकुंदन म्हणाले. तांत्रिक शिक्षण हा शाश्वत विकासाचा कणा आहे. तांत्रिक शिक्षणाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे अभियंत्यांनी देशाला घडविण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. सोबतच शैक्षणिक संस्थांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून त्या दिशेने कार्य केले पाहिजे. ‘व्हीएनआयटी’ यासाठी पूर्ण प्रयत्न करेल, असा विश्वास विश्राम जामदार यांनी व्यक्त केला. अभियंता दिनाचे औचित्य साधत संस्थेच्यावतीने दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.प्रमोद पडोळे यांनी पदवीदान करण्याअगोदर ‘डायरेक्टर्स रिपोर्ट’ सादर केला. कुलसचिव डॉ.एस.आर.साठे यांनी आभार मानले.१,१६३ विद्यार्थ्यांना पदवीदानदीक्षान्त समारोहात एकूण १ हजार १६३ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यात ७७ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, ३०७ विद्यार्थ्यांना ‘एमटेक’, ५५ विद्यार्थ्यांना ‘एमएसस्सी’ तर ६७२ विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी प्रदान करण्यात आली. ५७ जणांना ‘बीआर्क’ ही पदवी देण्यात आली. यंदा आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक ठरले. दरवर्षी ‘व्हीएनआयटी’तील सर्व विभागातून सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सर विश्वेश्वरैया पदक देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा ‘इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन’ अभियांत्रिकी विभागातील अद्देपल्ली शालिनी या विद्यार्थिनीला या पदकाने सन्मानित करण्यात आले. तर स्थापत्यशास्त्र विभागातील हरीश खैरनार या विद्यार्थ्याचा सर्वात जास्त पारितोषिकांनी सन्मान झाला. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अपूर्व कुंडलकर याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल हेमंत करकरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘रोबोटिक्स’मध्ये करणार करिअर: अद्देपल्ली शालिनीसर विश्वेश्वरैया पदकाची मानकरी ठरलेली अद्देपल्ली शालिनी ही मूळची आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील आहे. पदवी शिक्षण झाल्यानंतरच ती बेंगळुरू येथे एका नामांकित कंपनीत रुजू झाली. येणारा काळ हा तंत्रज्ञान व ‘रोबोटिक्स’चाच आहे. त्यामुळे मला भविष्यात ‘रोबोटिक्स’मध्ये ‘करिअर’ करायचे आहे. चारही वर्ष मी नियमित अभ्यासावर भर ठेवला. यातून आत्मविश्वासदेखील वाढत गेला, असे तिने सांगितले.विविध अभ्यासक्रमांचे टॉपर्सशाखा                                                                     नावमेकॅनिकल                                                       अपूर्व कुंडलकरकेमिकल                                                         श्रेयस जोशीसिव्हिल                                                          हरीश खैरनारसिव्हिल (एससी-एसटी महिला टॉपर)              गडमल्ला अलेक्याकॉम्प्युटर सायन्स                                            ओंकार झाडेकॉम्प्युटर सायन्स (द्वितीय टॉपर)                     इप्शिता भोसेइलेक्ट्रिकल                                                    अर्पिता पेटकरइलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन                    अद्देपल्ली शालिनीमेटालर्जिकल अ‍ॅन्ड मटेलिअल                         सुमेध कानडेमायनिंग                                                         शुभम थेरेआर्किटेक्चर                                                  पी.गौथमीआर्किटेक्चर (द्वितीय टॉपर)                           बार्शा अमरेंद्रवॉटर वर्क्स डिस्ट्रिब्युशन सिस्टम                   

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर