शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:44 IST

विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे५ ते ७ जानेवारीला आयोजन : महेश काळे, शर्वरी जमेनिस, नूरान सिर्स्टसच्या सादरीकरणाची रसिकांना मेजवानी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी कुलगुरू कालिदास यांच्या ‘विक्रमोर्वशीयम’ या विषयावर महोत्सवाची संकल्पना आहे. ५ जानेवारीला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याउपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, यानिमित्ताने नागपूरकर रसिकांना पुन्हा एकदा मातब्बर कलावंतांच्या शास्त्रीय संगीत, गायन व नृत्याची मेजवानी मिळणार आहे. 

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाबाबत माहिती दिली. तीन दिवसाच्या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सुकीर्ती उईके या स्थानिक कलावंताचे शास्त्रीय गायन होईल; त्यानंतर अरुपा लाहिरी यांचे भरतनाट्यम आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद रसिकांना मिळेल. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारीला सप्तकच्या सहकार्याने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यापाच तत्त्वावर आधारित पंचतत्त्व हा स्थानिक कलावंतांची नृत्यनाटिका सादर होईल. रेणुका देशकर यांची संकल्पना आहे. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव तर संगीत शैलेष दाणी यांचे राहणार आहे. यात विशेष सहभाग वैद्य मृणाल जामदार, संदीप शिरखेडकर व डॉ. मुरकुटे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर समन्वय सरकार यांचे सतार वादन व त्यानंतर नृत्यांगना अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. ७ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आदित्य खांडवे यांचे शास्त्रीय गायन व त्यानंतर सुश्री मोहंती यांची ओडिसी नृत्य व प्रसिद्ध सुफी गायिका नूरान भगिनी यांच्या सुफी गायनाची मेजवानी मिळणार आहे. तीनही दिवस सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली आहे.
 रसिकांसाठी बससेवेची सोयशहरातील संगीत रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून शहरातील विविध भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यावर परत जाण्यासाठीही ही व्यवस्था असेल. दुपारी ४.३० ते ६ या वेळेत बसेस सुटतील. स्वावलंबीनगर, पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा या ठिकाणाहून बसेस सुटणार आहेत. शिवाय ओला आणि उबेरची व्यवस्था सभागृहापासून करण्यात आली आहे.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर