शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:44 IST

विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे५ ते ७ जानेवारीला आयोजन : महेश काळे, शर्वरी जमेनिस, नूरान सिर्स्टसच्या सादरीकरणाची रसिकांना मेजवानी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी कुलगुरू कालिदास यांच्या ‘विक्रमोर्वशीयम’ या विषयावर महोत्सवाची संकल्पना आहे. ५ जानेवारीला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याउपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, यानिमित्ताने नागपूरकर रसिकांना पुन्हा एकदा मातब्बर कलावंतांच्या शास्त्रीय संगीत, गायन व नृत्याची मेजवानी मिळणार आहे. 

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाबाबत माहिती दिली. तीन दिवसाच्या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सुकीर्ती उईके या स्थानिक कलावंताचे शास्त्रीय गायन होईल; त्यानंतर अरुपा लाहिरी यांचे भरतनाट्यम आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद रसिकांना मिळेल. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारीला सप्तकच्या सहकार्याने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यापाच तत्त्वावर आधारित पंचतत्त्व हा स्थानिक कलावंतांची नृत्यनाटिका सादर होईल. रेणुका देशकर यांची संकल्पना आहे. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव तर संगीत शैलेष दाणी यांचे राहणार आहे. यात विशेष सहभाग वैद्य मृणाल जामदार, संदीप शिरखेडकर व डॉ. मुरकुटे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर समन्वय सरकार यांचे सतार वादन व त्यानंतर नृत्यांगना अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. ७ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आदित्य खांडवे यांचे शास्त्रीय गायन व त्यानंतर सुश्री मोहंती यांची ओडिसी नृत्य व प्रसिद्ध सुफी गायिका नूरान भगिनी यांच्या सुफी गायनाची मेजवानी मिळणार आहे. तीनही दिवस सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली आहे.
 रसिकांसाठी बससेवेची सोयशहरातील संगीत रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून शहरातील विविध भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यावर परत जाण्यासाठीही ही व्यवस्था असेल. दुपारी ४.३० ते ६ या वेळेत बसेस सुटतील. स्वावलंबीनगर, पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा या ठिकाणाहून बसेस सुटणार आहेत. शिवाय ओला आणि उबेरची व्यवस्था सभागृहापासून करण्यात आली आहे.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर