शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

कर्नल देशपांडे १९७१ च्या युद्धाचे शिलेदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देत जागरुक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य ते सतत करीत राहिले. कर्नल सुनील देशपांडे असे त्या माजी कमांडो प्रशिक्षकाचे नाव. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांसाठी विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) मिळविणारे कर्नल देशपांडे शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.

ठळक मुद्देप्रहार संस्थेमधून ३००हून अधिक युवकांचा भारतीय लष्करात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देत जागरुक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य ते सतत करीत राहिले. कर्नल सुनील देशपांडे असे त्या माजी कमांडो प्रशिक्षकाचे नाव. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांसाठी विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) मिळविणारे कर्नल देशपांडे शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.१० एप्रिल १९४३ रोजी नागपुरात जन्मलेले कर्नल सुनील देशपांडे यांनी १९६४ मध्ये सेकंड मराठा रेजिमेंटच्या लाईट इन्फन्ट्रीमध्ये कमिशन्ड आॅफिसर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांना भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या १९६५ च्या युद्धात शौर्य गाजवण्याची संधी मिळाली. शत्रूच्या हल्ल्याला त्यांनी परतवून लावले होते. पाकिस्तानच्या युद्धानंतर कर्नल देशपांडे यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धातही सहभाग घेतला होता. पाकिस्तानच्या शक्करगढ येथील युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पाकिस्तानचे अनेक रणगाडे त्यांच्या इन्फ न्ट्रीने उद्ध्वस्त केले होते. १९९३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली. त्यांचे शेवटचे पोस्टींग बेळगाव येथील कमांडो प्रशिक्षण केंद्रात होते. ‘प्रहार’ या चित्रपटातून कमांडो प्रशिक्षक म्हणून येण्यापूर्वी नाना पाटेकर यांना याच ठिकाणी कर्नल देशपांडे यांनी कमांडो प्रशिक्षण दिले. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात नाना पाटेकर लष्करी वेशात धावतोय आणि त्याच्या मागे असंख्य नागडी बालके धावताना दिसत आहेत. ‘कमॉन कमांडो’, अशी आरोळी देत नाना पुढे जातोय. राष्ट्र मजबुतीची परोपकारी वृत्ती ठेवून समाजात सैनिकांची मनोवृत्ती असावी, हा या चित्रपटातील संदेश घेऊन देशपांडे यांनी नोकरी सोडली आणि ९ जानेवारी १९९४ रोजी ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेची स्थापना केली. मुलांसाठी २००२ मध्ये लष्करी प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना केली. या दोन्ही संस्थेमधून सशक्त वर्तणूक, शिस्तबद्धता, धैर्य, देशभक्ती, दक्षता आणि मानवजातीची सेवा यासारख्या सैनिकांच्या वर्तणुकीला जागृत करण्याचे कार्य हाती घेतले. कर्नल देशपांडे यांनी उमरेडजवळ २.६६ एकर जागेत सैनिक प्रशिक्षण सुविधा उभारल्या. शिस्तबद्ध जीवनाचा अनुभव घेण्यासाठी या संस्थेमधून युवकांना दरवर्षी विविध लष्करी संस्थांमध्ये पाठविले जाते. आजवर ३०० हून अधिक युवकांनी भारतीय लष्करात प्रवेश घेतला.कर्नल देशपांडे यांच्या या उल्लेखनीय कार्याला घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८२ मध्ये सैन्य दिनानिमित्त सैन्यदल प्रमुखांच्या हस्ते ‘कमांडेशन कार्ड’, १९८७ च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘विशिष्ट सेवा पदक’, १९९८ मध्ये बँकर्स स्पोर्टस कौन्सिलचा ‘स्वर्गीय जी. टी. परांडे अवॉर्ड’, २००० मध्ये महाराष्ट्र  शासनाचा ‘महाराष्ट्र  गौरव पुरस्कार’, २००१ मध्ये सावरकर स्मारक समिती नागपूरतर्फे ‘सावरकर गौरव’ पुरस्कार, २००२ मध्ये सावरकर स्मारक समिती मुंबईतर्फे ‘सावरकर गौरव’ पुरस्कार, २००३ मध्ये रोटरी क्लबच्यावतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’, त्याच वर्षी मैत्री परिवारच्यावतीने सामाजिक कार्यासाठी पुरस्कार, २०१२ मध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूरतर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आले तर २०१४ मध्ये टाइम्स आॅफ इंडिया नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘हिरो आॅफ नागपूर’ म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर