शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कर्नल देशपांडे १९७१ च्या युद्धाचे शिलेदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देत जागरुक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य ते सतत करीत राहिले. कर्नल सुनील देशपांडे असे त्या माजी कमांडो प्रशिक्षकाचे नाव. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांसाठी विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) मिळविणारे कर्नल देशपांडे शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.

ठळक मुद्देप्रहार संस्थेमधून ३००हून अधिक युवकांचा भारतीय लष्करात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देत जागरुक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य ते सतत करीत राहिले. कर्नल सुनील देशपांडे असे त्या माजी कमांडो प्रशिक्षकाचे नाव. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांसाठी विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) मिळविणारे कर्नल देशपांडे शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.१० एप्रिल १९४३ रोजी नागपुरात जन्मलेले कर्नल सुनील देशपांडे यांनी १९६४ मध्ये सेकंड मराठा रेजिमेंटच्या लाईट इन्फन्ट्रीमध्ये कमिशन्ड आॅफिसर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांना भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या १९६५ च्या युद्धात शौर्य गाजवण्याची संधी मिळाली. शत्रूच्या हल्ल्याला त्यांनी परतवून लावले होते. पाकिस्तानच्या युद्धानंतर कर्नल देशपांडे यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धातही सहभाग घेतला होता. पाकिस्तानच्या शक्करगढ येथील युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पाकिस्तानचे अनेक रणगाडे त्यांच्या इन्फ न्ट्रीने उद्ध्वस्त केले होते. १९९३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली. त्यांचे शेवटचे पोस्टींग बेळगाव येथील कमांडो प्रशिक्षण केंद्रात होते. ‘प्रहार’ या चित्रपटातून कमांडो प्रशिक्षक म्हणून येण्यापूर्वी नाना पाटेकर यांना याच ठिकाणी कर्नल देशपांडे यांनी कमांडो प्रशिक्षण दिले. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात नाना पाटेकर लष्करी वेशात धावतोय आणि त्याच्या मागे असंख्य नागडी बालके धावताना दिसत आहेत. ‘कमॉन कमांडो’, अशी आरोळी देत नाना पुढे जातोय. राष्ट्र मजबुतीची परोपकारी वृत्ती ठेवून समाजात सैनिकांची मनोवृत्ती असावी, हा या चित्रपटातील संदेश घेऊन देशपांडे यांनी नोकरी सोडली आणि ९ जानेवारी १९९४ रोजी ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेची स्थापना केली. मुलांसाठी २००२ मध्ये लष्करी प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना केली. या दोन्ही संस्थेमधून सशक्त वर्तणूक, शिस्तबद्धता, धैर्य, देशभक्ती, दक्षता आणि मानवजातीची सेवा यासारख्या सैनिकांच्या वर्तणुकीला जागृत करण्याचे कार्य हाती घेतले. कर्नल देशपांडे यांनी उमरेडजवळ २.६६ एकर जागेत सैनिक प्रशिक्षण सुविधा उभारल्या. शिस्तबद्ध जीवनाचा अनुभव घेण्यासाठी या संस्थेमधून युवकांना दरवर्षी विविध लष्करी संस्थांमध्ये पाठविले जाते. आजवर ३०० हून अधिक युवकांनी भारतीय लष्करात प्रवेश घेतला.कर्नल देशपांडे यांच्या या उल्लेखनीय कार्याला घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८२ मध्ये सैन्य दिनानिमित्त सैन्यदल प्रमुखांच्या हस्ते ‘कमांडेशन कार्ड’, १९८७ च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘विशिष्ट सेवा पदक’, १९९८ मध्ये बँकर्स स्पोर्टस कौन्सिलचा ‘स्वर्गीय जी. टी. परांडे अवॉर्ड’, २००० मध्ये महाराष्ट्र  शासनाचा ‘महाराष्ट्र  गौरव पुरस्कार’, २००१ मध्ये सावरकर स्मारक समिती नागपूरतर्फे ‘सावरकर गौरव’ पुरस्कार, २००२ मध्ये सावरकर स्मारक समिती मुंबईतर्फे ‘सावरकर गौरव’ पुरस्कार, २००३ मध्ये रोटरी क्लबच्यावतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’, त्याच वर्षी मैत्री परिवारच्यावतीने सामाजिक कार्यासाठी पुरस्कार, २०१२ मध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूरतर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आले तर २०१४ मध्ये टाइम्स आॅफ इंडिया नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘हिरो आॅफ नागपूर’ म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर