शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

व्यापक जनहितासाठी सामूहिक क्वारंटाईन आवश्यक; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:49 IST

नागपुरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे व्यापक जनहित लक्षात घेता हॉटस्पॉटमधील नागरिकांचे सामूहिक क्वारंटाईन करणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी मंगळवारी दिला.

ठळक मुद्देप्रशासनाला मनाई हुकूम देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे व्यापक जनहित लक्षात घेता हॉटस्पॉटमधील नागरिकांचे सामूहिक क्वारंटाईन करणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी मंगळवारी दिला. तसेच, जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना सामूहिक क्वारंटाईनसंदर्भात कोणताही अंतरिम मनाई हुकूम देता येणार नाही असे स्पष्ट केले.देशातील नागरिकांच्या भल्याचा विचार करणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे सरकार जनहितासाठी आवश्यक असलेली कारवाई करू शकते. वर्तमान कोरोना संक्रमणाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे यात समाजाचे कल्याण आहे. सरकार या जबाबदारीचा त्याग करू शकत नाही. अशा कठीण काळात केलेली कारवाई काही प्रमाणात कमीजास्त होऊ शकते. त्यामुळे कारवाईच्या वैधतेचे ठोस पुरावे मागता येणार नाही. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महानगरपालिकेची नागरिकांना सामूहिक क्वारंटाईन करण्याची कारवाई योग्य आहे. त्याच्या समर्थनासाठी आणखी दुसऱ्या पुराव्याची गरज नाही, असे विस्तृत निरीक्षण न्यायालयाने हा निर्वाळा देताना नोंदवले.यासंदर्भात छावणी येथील मो. निशत मो. सलीम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यांचा नागरिकांच्या सामूहिक क्वारंटाईनला विरोध होता. मोमीनपुरा, सतरंजीपुरा आणि अन्य कोरोना संक्रमित भागातील नागरिकांचे सामूहिक क्वारंटाईन करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना देण्यात यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. एका मध्यस्थी अर्जदारानेही सामूहिक क्वारंटाईनवर आक्षेप घेतले होते. परंतु, त्यांचे मुद्दे न्यायालयाला प्रभावित करू शकले नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर, मध्यस्थांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. शंतनू घाटे, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.क्वारंटाईन सेंटरसाठी तज्ज्ञांची समितीआमदार निवास व व्हीएनआयटी वसतिगृह येथील सरकारी क्वारंटाईन सेंटरमुळे नजिकच्या वस्त्यांमध्ये कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे किंवा नाही याचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाने आरोग्य उपसंचालक, सिव्हिल सर्जन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष यांची समिती स्थापन करण्याचा आदेश सरकारला दिला. त्यासाठी सरकारला दोन दिवसाचा वेळ देण्यात आला. त्यानंतर समितीने पुढील दोन दिवसात आवश्यक अभ्यास करून अहवाल सादर करावा आणि सरकारने त्यानंतर तीन दिवसामध्ये हे क्वारंटाईन सेंटर कायम ठेवायचे की, दुसरीकडे स्थानांतरित करायचे यावर नव्याने निर्णय घ्यावा असे न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले.क्वारंटाईन नागरिकांच्या सुविधेचे निर्देशसरकारी क्वारंटाईनमधील नागरिकांच्या सुविधेसंदर्भात उच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे विविध निर्देश दिले. त्यामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.१ - क्वारंटाईनमधील नागरिकांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतील याची खात्री करून घ्यावी.२ - क्वारंटाईनमधील नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी व कोरोना आजाराच्या वर्तमान स्थितीविषयी नियमित माहिती पुरविण्यात यावी.३ - सरकारी क्वारंटाईन सेंटर्समध्ये आरोग्यवर्धक वातावरण ठेवण्यात यावेत.४ - क्वारंटाईनमधील नागरिकांना आवश्यक स्वच्छतागृहे पुरविण्यात यावीत.५ - क्वारंटाईन नागरिकांची चाचणी व अहवालाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करावी.६ - कोरोना रुग्णांना सुटी देण्यासंदर्भातील मार्गदर्शकतत्त्वांचे काटेकोर पालन करावे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय