शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

चातुर्मासात नारळ महागणार : उत्पादनात ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:43 IST

गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे किरकोळमध्ये चढ्या भावात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.चातुर्मासात नारळाला मागणीचातुर्मासात अनेक धार्मिक कार्य असल्यामुळे पूजेसाठी नारळाचे महत्त्व असते. या दिवसात नारळाला मागणी वाढते. चातुर्मासात नागपुरात तीन लाखांपर्यंत नारळाची विक्री होते. नारळाचे ठोक विक्रेते सुनील कोकनट कंपनीचे संचालक धनश्याम छाबरिया यांनी सांगितले की, नागपुरात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि गोवा येथून नारळाची आवक होते. चारही राज्यांमध्ये उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे भाव वाढणार आहे. श्रावण महिन्यात भाविकांना जास्त दरात नारळ खरेदी करावे लागणार आहे.आवक घटलीपाच वर्षांपूर्वी नागपुरात दररोज २५ ते ३० ट्रक नारळाची आवक होती. प्रत्येक ट्रक पाच लाख दराने एकूण दीड कोटींची उलाढाल व्हायची. नागपुरात संपूर्ण विदर्भात नारळ विक्रीस जायचे. पण आता तेथील व्यापाऱ्यांनी चारही राज्यातून नाराळाची खरेदी वाढविल्यामुळे नागपुरातून जावक कमी झाली आहे. सध्या नागपुरात नारळाचा व्यापार अर्ध्यावर आला आहे. आता १० ते १२ ट्रकची आवक आहे. पूर्वीच्या तुलनेत नारळाचे व्यापारीही कमी झाले आहेत. सध्या १० ते १२ व्यापारी हा व्यापार करीत आहेत. भाव वाढले, पण सध्या भाविकांकडून नारळाला मागणी कमी असल्यामुळे माल पडून आहे.किराणा मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष छाबरानी म्हणाले, संपूर्ण भारतात बेंगळुरूपासून ९० कि़मी. अंतरावरील वनियममारी येथे सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते. येथील नारळ सर्वोत्कृष्ट समजले जाते. पण या ठिकाणी कमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. केवळ २० टक्के उत्पादन झाले. तसेच कमी पावसामुळे नारळाची झाडे आजाराने खराब झाली. त्याचाही फटका उत्पादनाला बसला.सध्या बाजारात सुके आणि ओल्या नाराळाची आवक आहे. १०० भरतीच्या ओल्या नारळाची किंमत १६०० रुपये आहे. १५ दिवसात १०० रुपयांची वाढ झाली आहे. तर २०० भरतीचे सुके नारळाची किंमत ४२०० रुपये आहे. हे नारळ ठोकमध्ये १६ ते २० रुपयांदरम्यान आहेत. किरकोळमध्ये ३० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. पुढे आवक कमी झाल्यास भाविकांना पूजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर