शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्मासात नारळ महागणार : उत्पादनात ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:43 IST

गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे किरकोळमध्ये चढ्या भावात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.चातुर्मासात नारळाला मागणीचातुर्मासात अनेक धार्मिक कार्य असल्यामुळे पूजेसाठी नारळाचे महत्त्व असते. या दिवसात नारळाला मागणी वाढते. चातुर्मासात नागपुरात तीन लाखांपर्यंत नारळाची विक्री होते. नारळाचे ठोक विक्रेते सुनील कोकनट कंपनीचे संचालक धनश्याम छाबरिया यांनी सांगितले की, नागपुरात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि गोवा येथून नारळाची आवक होते. चारही राज्यांमध्ये उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे भाव वाढणार आहे. श्रावण महिन्यात भाविकांना जास्त दरात नारळ खरेदी करावे लागणार आहे.आवक घटलीपाच वर्षांपूर्वी नागपुरात दररोज २५ ते ३० ट्रक नारळाची आवक होती. प्रत्येक ट्रक पाच लाख दराने एकूण दीड कोटींची उलाढाल व्हायची. नागपुरात संपूर्ण विदर्भात नारळ विक्रीस जायचे. पण आता तेथील व्यापाऱ्यांनी चारही राज्यातून नाराळाची खरेदी वाढविल्यामुळे नागपुरातून जावक कमी झाली आहे. सध्या नागपुरात नारळाचा व्यापार अर्ध्यावर आला आहे. आता १० ते १२ ट्रकची आवक आहे. पूर्वीच्या तुलनेत नारळाचे व्यापारीही कमी झाले आहेत. सध्या १० ते १२ व्यापारी हा व्यापार करीत आहेत. भाव वाढले, पण सध्या भाविकांकडून नारळाला मागणी कमी असल्यामुळे माल पडून आहे.किराणा मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष छाबरानी म्हणाले, संपूर्ण भारतात बेंगळुरूपासून ९० कि़मी. अंतरावरील वनियममारी येथे सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते. येथील नारळ सर्वोत्कृष्ट समजले जाते. पण या ठिकाणी कमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. केवळ २० टक्के उत्पादन झाले. तसेच कमी पावसामुळे नारळाची झाडे आजाराने खराब झाली. त्याचाही फटका उत्पादनाला बसला.सध्या बाजारात सुके आणि ओल्या नाराळाची आवक आहे. १०० भरतीच्या ओल्या नारळाची किंमत १६०० रुपये आहे. १५ दिवसात १०० रुपयांची वाढ झाली आहे. तर २०० भरतीचे सुके नारळाची किंमत ४२०० रुपये आहे. हे नारळ ठोकमध्ये १६ ते २० रुपयांदरम्यान आहेत. किरकोळमध्ये ३० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. पुढे आवक कमी झाल्यास भाविकांना पूजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर