शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चातुर्मासात नारळ महागणार : उत्पादनात ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:43 IST

गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे किरकोळमध्ये चढ्या भावात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.चातुर्मासात नारळाला मागणीचातुर्मासात अनेक धार्मिक कार्य असल्यामुळे पूजेसाठी नारळाचे महत्त्व असते. या दिवसात नारळाला मागणी वाढते. चातुर्मासात नागपुरात तीन लाखांपर्यंत नारळाची विक्री होते. नारळाचे ठोक विक्रेते सुनील कोकनट कंपनीचे संचालक धनश्याम छाबरिया यांनी सांगितले की, नागपुरात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि गोवा येथून नारळाची आवक होते. चारही राज्यांमध्ये उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे भाव वाढणार आहे. श्रावण महिन्यात भाविकांना जास्त दरात नारळ खरेदी करावे लागणार आहे.आवक घटलीपाच वर्षांपूर्वी नागपुरात दररोज २५ ते ३० ट्रक नारळाची आवक होती. प्रत्येक ट्रक पाच लाख दराने एकूण दीड कोटींची उलाढाल व्हायची. नागपुरात संपूर्ण विदर्भात नारळ विक्रीस जायचे. पण आता तेथील व्यापाऱ्यांनी चारही राज्यातून नाराळाची खरेदी वाढविल्यामुळे नागपुरातून जावक कमी झाली आहे. सध्या नागपुरात नारळाचा व्यापार अर्ध्यावर आला आहे. आता १० ते १२ ट्रकची आवक आहे. पूर्वीच्या तुलनेत नारळाचे व्यापारीही कमी झाले आहेत. सध्या १० ते १२ व्यापारी हा व्यापार करीत आहेत. भाव वाढले, पण सध्या भाविकांकडून नारळाला मागणी कमी असल्यामुळे माल पडून आहे.किराणा मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष छाबरानी म्हणाले, संपूर्ण भारतात बेंगळुरूपासून ९० कि़मी. अंतरावरील वनियममारी येथे सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते. येथील नारळ सर्वोत्कृष्ट समजले जाते. पण या ठिकाणी कमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. केवळ २० टक्के उत्पादन झाले. तसेच कमी पावसामुळे नारळाची झाडे आजाराने खराब झाली. त्याचाही फटका उत्पादनाला बसला.सध्या बाजारात सुके आणि ओल्या नाराळाची आवक आहे. १०० भरतीच्या ओल्या नारळाची किंमत १६०० रुपये आहे. १५ दिवसात १०० रुपयांची वाढ झाली आहे. तर २०० भरतीचे सुके नारळाची किंमत ४२०० रुपये आहे. हे नारळ ठोकमध्ये १६ ते २० रुपयांदरम्यान आहेत. किरकोळमध्ये ३० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. पुढे आवक कमी झाल्यास भाविकांना पूजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर