शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ पर्यंत कोळशाची आयात बंद; कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा, देशात उत्पादन वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 05:34 IST

केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: २०२४-२५ पर्यंत कोळशाची आयात बंद करणार असल्याची घोषणा केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी नागपुरात केली. केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन धोरणामुळे हे उद्दिष्ट गाठणे सोपे होणार असल्याचा त्यांनी दावा केला.

चिटणवीस केंद्र येथे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेद कौन्सिल आणि एमएम ॲक्टिव्ह यांच्या वतीने आयोजित ‘मिन्कॉन’ या खाण प्रदर्शन व संमेलनाच्या उद्घाटन सत्रात जोशी बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खाण मंत्री दादाजी भुसे, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जैस्वाल, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, रवी बोरटकर प्रामुख्याने उपस्थित होते. उद्योगाजून मिळणारा महसूल गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. 

या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये खाण धोरणात सुधारणा करून केंद्र सरकारने राज्याला ९० टक्के अधिकार दिले आहेत. कोळसा खाणकामाचे उत्पन्न ५० हजार कोटींपर्यंत वाढवणाऱ्या ओडिशाचे उदाहरण देत त्यांनी या धोरणाचे चांगले परिणाम झाल्याचा दावा केला. नवीन धोरणानुसार ४७ खाणींचा लिलाव करण्यात आला आहे. खाणीजवळच संबंधित उद्योगांचा विकास होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राने खाण विकासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

सध्या कोळशाची कमतरता नाही

देशात कोळशाचा तुटवडा नाही. १० वर्षांपूर्वी ऑक्टोबरमध्ये १० ते १५ दशलक्ष टन कोळशाचे उत्खनन झाले आहे, तर वर्षाला ६० हजार मिलियन टन उत्खनन होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढत असल्याने कोळसा आयात करण्याची गरज नाही, असे जोशी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट