शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

२०२४ पर्यंत कोळशाची आयात बंद; कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा, देशात उत्पादन वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 05:34 IST

केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: २०२४-२५ पर्यंत कोळशाची आयात बंद करणार असल्याची घोषणा केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी नागपुरात केली. केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन धोरणामुळे हे उद्दिष्ट गाठणे सोपे होणार असल्याचा त्यांनी दावा केला.

चिटणवीस केंद्र येथे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेद कौन्सिल आणि एमएम ॲक्टिव्ह यांच्या वतीने आयोजित ‘मिन्कॉन’ या खाण प्रदर्शन व संमेलनाच्या उद्घाटन सत्रात जोशी बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खाण मंत्री दादाजी भुसे, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जैस्वाल, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, रवी बोरटकर प्रामुख्याने उपस्थित होते. उद्योगाजून मिळणारा महसूल गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. 

या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये खाण धोरणात सुधारणा करून केंद्र सरकारने राज्याला ९० टक्के अधिकार दिले आहेत. कोळसा खाणकामाचे उत्पन्न ५० हजार कोटींपर्यंत वाढवणाऱ्या ओडिशाचे उदाहरण देत त्यांनी या धोरणाचे चांगले परिणाम झाल्याचा दावा केला. नवीन धोरणानुसार ४७ खाणींचा लिलाव करण्यात आला आहे. खाणीजवळच संबंधित उद्योगांचा विकास होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राने खाण विकासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

सध्या कोळशाची कमतरता नाही

देशात कोळशाचा तुटवडा नाही. १० वर्षांपूर्वी ऑक्टोबरमध्ये १० ते १५ दशलक्ष टन कोळशाचे उत्खनन झाले आहे, तर वर्षाला ६० हजार मिलियन टन उत्खनन होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढत असल्याने कोळसा आयात करण्याची गरज नाही, असे जोशी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट