शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या दरवाढीमुळे देशात कोळसा संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 11:17 IST

डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ झाल्याचे सांगत कोळसा कंपन्यांच्या वाहतूक कंत्राटदारांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देरस्ते वाहतुकीसह रेल्वेचाही वापर गरजेचा

कमल शर्मा

नागपूर : आयात वाढूनही महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील वीज केंद्रांतील कोळशाची टंचाई संपलेली नाही. पावसाळा संपताच निर्माण झालेल्या या टंचाईच्या कारणाचा शोध घेतला असता यामागे डिझेलची भाववाढ हेसुद्धा एक मोठे कारण असल्याचे पुढे आले आहे. डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ झाल्याचे सांगत कोळसा कंपन्यांच्या वाहतूक कंत्राटदारांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

तर, केंद्र सरकारने परिस्थिती लक्षात घेता वीज कंपन्यांना मार्ग सह रेल्वे (आरसीआर) परिवहन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीज कंपन्यांकडे याबाबतचे व्यवस्थापन नसल्याने कोळसा पुरवठा अपेक्षित वेगाने होत नसल्याचे दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातील केंद्रांकडे फक्त १.७ दिवस पुरेल एवढाच साठा आहे. राज्यातील तीन युनिट बंद आहेत. मागणी २० हजार मेगावॅटच्याही पुढे गेली आहे.

पॉवर एक्सचेंजच्या माध्यमातून महागड्या दराने खरेदी केली जाणारी वीज आणि गैरपारंपरिक ऊर्जेच्या बळावर सध्यातरी महाराष्ट्र राज्य लोडशेडिंगपासून मुक्त आहे. पाऊस थांबल्याने दोन रॅक कोळशाची आवक वाढली असतानाच वाहतुकीचे संकट ठाकले. आजवर खाणींमधून कोळसा पोहोचविण्याची जबाबदारी कोळसा कंपन्यांवर होती. मात्र, सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या वेकोलीच्या पुरवठा ठेकेदारांनी डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढविण्याची मागणी करत काम थांबविले आहे. यामुळे पुरवठा कायम राहावा, यासाठी केंद्र सरकारने मार्ग सह रेल्वे परिवहनाचे निर्देश दिले आहेत.

...तर कोळसा अन्य कंपनीला देणार : केंद्राचा इशारा

महाजनको आरसीआरच्या माध्यमातून कोळशाची उचल करणार नसेल तर हा कोळसा दुसऱ्या कंपनीला दिला जाईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला. यामुळे महाजनकोने आपल्या वाहतूक ठेकेदारांना विनंती करून काम सुरू केले आहे. लवकरच निविदा काढली जाण्याची शक्यता आहे. केद्राच्या निर्देशांचे पालन केले जात असून, आरसीआरच्या माध्यमातून केंद्राने निर्धारित केलेल्या कोळशाची उचल केली जाईल, असे महाजनकोचे संचालक (मायनिंग) पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले.

महाजनकोकडून कोळशाची उचल

कंपनी           कोळसा
वेकोली५ लाख मेट्रिक टन
एसईसीएल४.५ लाख मेट्रिक टन
एमईसीएल१.५ लाख मेट्रिक टन
टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटGovernmentसरकार