शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे ग्राहक मंदी!

By admin | Updated: November 15, 2016 02:22 IST

एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या

नागपूर : एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या ओळीत पाय ठेवायला जागा नसायची, त्या ओळीत गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट जाणवतो आहे. इतवारी परिसरातील किराणा ओळीतही हीच अवस्था आहे. नोटाबंदीमुळे किराणा व्यवसायावर मंदी येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी केली नव्हती. परंतु नोटाबंदीमुळे किराणा ओळीत सलग सहा दिवसांपासून ग्राहकी नसल्याचा अनुभव येथील व्यापाऱ्यांना अनेक वर्षानंतर आला आहे. केंद्र सरकारने ९ नोव्हेंबरपासून देशभरात ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बंद केली. त्याचा परिणाम थेट व्यापारावर झाला. किराणासारखे व्यवसाय, जे दैनंदिन गरजेचे असतात. लग्नकार्याच्या सिझनमध्ये जिथे सातत्याने लगबग असते, अशा इतवारी परिसरातील किराणा ओळीत नोटाबंदीमुळे ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र आहे. सरकारने ११ नोव्हेंबरपासून बँकेतून पैशाची देवाण-घेवाण सुरू केली. मात्र मिळणारा पैसाही तोकडाच असल्याने, लोकांनी त्यात आपल्या गरजा पूर्ण केल्या. किराणा व्यवसाय साधारणत: महिन्याच्या ५ ते १५ या तारखांमध्ये तेजीत असतो. ग्राहकांचे वेतन या काळात होत असल्याने, इतवारी किराणा ओळीत लोकांची गर्दी असते. सध्या तर लग्नाचा सिझन आहे. या काळात तर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना वेळ नसतो. परंतु गेल्या ९ तारखेपासून सर्व व्यापारी सुस्त बसले आहेत. पहिल्या दिवशी ग्राहक आलेत. मात्र सामान कमी आणि चिल्लर अधिक घेण्यासाठी. त्यात व्यापाऱ्यांजवळील बहुतांश चिल्लर संपून गेली. बँका सुद्धा बंद होत्या. व्यापाराला अपेक्षित पैसा बँकेतून मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेणे बंद केले. तेव्हापासून किराणा ओळीतून ग्राहकांनीही पाय काढला. सलग सहा दिवसांपासून व्यापारी दुकान उघडून बसले आहे. काही व्यवहार चेकद्वारे सुरू आहे. किराणा व्यवसाय रोखीचा असल्याने किमान ८० टक्के परिणाम व्यवसायावर झाल्याचे व्यापारी सांगतात. (प्रतिनिधी) सोमवारी अपेक्षा होती सरकारच्या या निर्णयाचा असा परिणाम होईल, अशी अपेक्षा नव्हती. सलग सहा दिवसांपासून बाजारपेठेत असलेला शुकशुकाट पहिल्यांदाच अनुभवत आहे. सोमवारपासून बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आजही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. मनोहर गोखले, किराणा व्यवसायिक व्यवसायाला ७० ते ८० फटका नोव्हेंबरच्या काळात आम्हाला श्वास घ्यायला वेळ नसते. लग्नाचा सिझन असल्याने, किराणा ओळीत पाय ठेवायला जागा नसते. परंतु नोटाबंदीमुळे ग्राहकी कमी झाली आहे. या आठवडाभरात किमान ७० ते ८० टक्के व्यवसायाला फटका बसला आहे. भरत वाधवानी, किराणा व्यापारी