शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

नोटाबंदीमुळे ग्राहक मंदी!

By admin | Updated: November 15, 2016 02:22 IST

एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या

नागपूर : एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या ओळीत पाय ठेवायला जागा नसायची, त्या ओळीत गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट जाणवतो आहे. इतवारी परिसरातील किराणा ओळीतही हीच अवस्था आहे. नोटाबंदीमुळे किराणा व्यवसायावर मंदी येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी केली नव्हती. परंतु नोटाबंदीमुळे किराणा ओळीत सलग सहा दिवसांपासून ग्राहकी नसल्याचा अनुभव येथील व्यापाऱ्यांना अनेक वर्षानंतर आला आहे. केंद्र सरकारने ९ नोव्हेंबरपासून देशभरात ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बंद केली. त्याचा परिणाम थेट व्यापारावर झाला. किराणासारखे व्यवसाय, जे दैनंदिन गरजेचे असतात. लग्नकार्याच्या सिझनमध्ये जिथे सातत्याने लगबग असते, अशा इतवारी परिसरातील किराणा ओळीत नोटाबंदीमुळे ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र आहे. सरकारने ११ नोव्हेंबरपासून बँकेतून पैशाची देवाण-घेवाण सुरू केली. मात्र मिळणारा पैसाही तोकडाच असल्याने, लोकांनी त्यात आपल्या गरजा पूर्ण केल्या. किराणा व्यवसाय साधारणत: महिन्याच्या ५ ते १५ या तारखांमध्ये तेजीत असतो. ग्राहकांचे वेतन या काळात होत असल्याने, इतवारी किराणा ओळीत लोकांची गर्दी असते. सध्या तर लग्नाचा सिझन आहे. या काळात तर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना वेळ नसतो. परंतु गेल्या ९ तारखेपासून सर्व व्यापारी सुस्त बसले आहेत. पहिल्या दिवशी ग्राहक आलेत. मात्र सामान कमी आणि चिल्लर अधिक घेण्यासाठी. त्यात व्यापाऱ्यांजवळील बहुतांश चिल्लर संपून गेली. बँका सुद्धा बंद होत्या. व्यापाराला अपेक्षित पैसा बँकेतून मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेणे बंद केले. तेव्हापासून किराणा ओळीतून ग्राहकांनीही पाय काढला. सलग सहा दिवसांपासून व्यापारी दुकान उघडून बसले आहे. काही व्यवहार चेकद्वारे सुरू आहे. किराणा व्यवसाय रोखीचा असल्याने किमान ८० टक्के परिणाम व्यवसायावर झाल्याचे व्यापारी सांगतात. (प्रतिनिधी) सोमवारी अपेक्षा होती सरकारच्या या निर्णयाचा असा परिणाम होईल, अशी अपेक्षा नव्हती. सलग सहा दिवसांपासून बाजारपेठेत असलेला शुकशुकाट पहिल्यांदाच अनुभवत आहे. सोमवारपासून बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आजही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. मनोहर गोखले, किराणा व्यवसायिक व्यवसायाला ७० ते ८० फटका नोव्हेंबरच्या काळात आम्हाला श्वास घ्यायला वेळ नसते. लग्नाचा सिझन असल्याने, किराणा ओळीत पाय ठेवायला जागा नसते. परंतु नोटाबंदीमुळे ग्राहकी कमी झाली आहे. या आठवडाभरात किमान ७० ते ८० टक्के व्यवसायाला फटका बसला आहे. भरत वाधवानी, किराणा व्यापारी