शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गिर्यारोहणावर केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही : चेतना साहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:44 IST

लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला

नागपूर : गिर्यारोहणामध्ये महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी बघता या प्रकारवरची पुरुषांची मक्तेदारी आता संपुष्टात आली असल्याचे मत प्रसिद्ध गिर्यारोहक चेतना साहू यांनी व्यक्त केले.

वर्धेवरून एक कार्यक्रम आटोपून नागपूरला आल्यानंतर त्यांनी काही वेळ शहरात व्यतीत केला. यावेळी लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जगण्याची कला शिकविण्याचे यशस्वी माध्यम म्हणजे गिर्यारोहण. कारण कुढलीही चढाई करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहावे लागते. आयुष्य सुद्धा असेच असते. शिवाय एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवून गिर्यारोहण केले जाते. दैनंदिन जीवनातसुद्धा ध्येयनिश्चितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात काय मिळवायचे आहे हे जर स्पष्ट असले तर त्यादृष्टीने माणूस एक एक पाऊल पुढे टाकतो. त्यामुळे आयुष्य आणि गिर्यारोहण या दोन्हीमध्ये समर्पणाला खूप महत्त्व आहे.

बच्छेंद्रीपालकडून मिळाली प्रेरणा

१९८५ साली चेतना साहू यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. वर्षभराआधी त्यांनी बच्छेंद्रीपाल यांच्याविषयी ऐकले होते. माऊंट एव्हरेस्टवर सर्वात प्रथम पाऊल ठेवणारी महिला म्हणून बच्छेंद्रीपाल यांची ओळख आहे. चेतना यांच्यासाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या. त्यानंतर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनरिंग, उत्तरकाशी येथे त्यांनी गिर्यारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

माउंट एव्हरेस्ट सर करणारे सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य

चेतना यांचे पती प्रदीप साहूसुद्धा गिर्यारोहक होते. २०१६ साली चेतना आणि त्यांच्या पतीने पन्नासाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली होती. अशी कामगिरी करणारे ते सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य ठरले. ही मोहीम फत्ते करून परतत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चेतना यांची प्रकृती चांगलीच बिघडली. यातून सावरण्यासाठी त्यांना तब्बल अडीच वर्षे लागली. प्रदीप यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी गिर्यारोहण करणे सुरूच ठेवले. ट्रान्स हिमालय गिर्यारोहणासाठी त्यांना बच्छेंद्रीपाल आणि काही पन्नाशीतल्या महिलांसोबत नव्या मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. या तुकडीने पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूर्व ते पश्चिम हिमालयाची ४९०० किलोमीटरची उंची पार केली होती. मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक