शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहणावर केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही : चेतना साहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:44 IST

लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला

नागपूर : गिर्यारोहणामध्ये महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी बघता या प्रकारवरची पुरुषांची मक्तेदारी आता संपुष्टात आली असल्याचे मत प्रसिद्ध गिर्यारोहक चेतना साहू यांनी व्यक्त केले.

वर्धेवरून एक कार्यक्रम आटोपून नागपूरला आल्यानंतर त्यांनी काही वेळ शहरात व्यतीत केला. यावेळी लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जगण्याची कला शिकविण्याचे यशस्वी माध्यम म्हणजे गिर्यारोहण. कारण कुढलीही चढाई करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहावे लागते. आयुष्य सुद्धा असेच असते. शिवाय एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवून गिर्यारोहण केले जाते. दैनंदिन जीवनातसुद्धा ध्येयनिश्चितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात काय मिळवायचे आहे हे जर स्पष्ट असले तर त्यादृष्टीने माणूस एक एक पाऊल पुढे टाकतो. त्यामुळे आयुष्य आणि गिर्यारोहण या दोन्हीमध्ये समर्पणाला खूप महत्त्व आहे.

बच्छेंद्रीपालकडून मिळाली प्रेरणा

१९८५ साली चेतना साहू यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. वर्षभराआधी त्यांनी बच्छेंद्रीपाल यांच्याविषयी ऐकले होते. माऊंट एव्हरेस्टवर सर्वात प्रथम पाऊल ठेवणारी महिला म्हणून बच्छेंद्रीपाल यांची ओळख आहे. चेतना यांच्यासाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या. त्यानंतर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनरिंग, उत्तरकाशी येथे त्यांनी गिर्यारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

माउंट एव्हरेस्ट सर करणारे सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य

चेतना यांचे पती प्रदीप साहूसुद्धा गिर्यारोहक होते. २०१६ साली चेतना आणि त्यांच्या पतीने पन्नासाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली होती. अशी कामगिरी करणारे ते सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य ठरले. ही मोहीम फत्ते करून परतत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चेतना यांची प्रकृती चांगलीच बिघडली. यातून सावरण्यासाठी त्यांना तब्बल अडीच वर्षे लागली. प्रदीप यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी गिर्यारोहण करणे सुरूच ठेवले. ट्रान्स हिमालय गिर्यारोहणासाठी त्यांना बच्छेंद्रीपाल आणि काही पन्नाशीतल्या महिलांसोबत नव्या मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. या तुकडीने पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूर्व ते पश्चिम हिमालयाची ४९०० किलोमीटरची उंची पार केली होती. मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक