शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहणावर केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही : चेतना साहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:44 IST

लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला

नागपूर : गिर्यारोहणामध्ये महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी बघता या प्रकारवरची पुरुषांची मक्तेदारी आता संपुष्टात आली असल्याचे मत प्रसिद्ध गिर्यारोहक चेतना साहू यांनी व्यक्त केले.

वर्धेवरून एक कार्यक्रम आटोपून नागपूरला आल्यानंतर त्यांनी काही वेळ शहरात व्यतीत केला. यावेळी लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जगण्याची कला शिकविण्याचे यशस्वी माध्यम म्हणजे गिर्यारोहण. कारण कुढलीही चढाई करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहावे लागते. आयुष्य सुद्धा असेच असते. शिवाय एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवून गिर्यारोहण केले जाते. दैनंदिन जीवनातसुद्धा ध्येयनिश्चितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात काय मिळवायचे आहे हे जर स्पष्ट असले तर त्यादृष्टीने माणूस एक एक पाऊल पुढे टाकतो. त्यामुळे आयुष्य आणि गिर्यारोहण या दोन्हीमध्ये समर्पणाला खूप महत्त्व आहे.

बच्छेंद्रीपालकडून मिळाली प्रेरणा

१९८५ साली चेतना साहू यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. वर्षभराआधी त्यांनी बच्छेंद्रीपाल यांच्याविषयी ऐकले होते. माऊंट एव्हरेस्टवर सर्वात प्रथम पाऊल ठेवणारी महिला म्हणून बच्छेंद्रीपाल यांची ओळख आहे. चेतना यांच्यासाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या. त्यानंतर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनरिंग, उत्तरकाशी येथे त्यांनी गिर्यारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

माउंट एव्हरेस्ट सर करणारे सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य

चेतना यांचे पती प्रदीप साहूसुद्धा गिर्यारोहक होते. २०१६ साली चेतना आणि त्यांच्या पतीने पन्नासाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली होती. अशी कामगिरी करणारे ते सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य ठरले. ही मोहीम फत्ते करून परतत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चेतना यांची प्रकृती चांगलीच बिघडली. यातून सावरण्यासाठी त्यांना तब्बल अडीच वर्षे लागली. प्रदीप यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी गिर्यारोहण करणे सुरूच ठेवले. ट्रान्स हिमालय गिर्यारोहणासाठी त्यांना बच्छेंद्रीपाल आणि काही पन्नाशीतल्या महिलांसोबत नव्या मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. या तुकडीने पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूर्व ते पश्चिम हिमालयाची ४९०० किलोमीटरची उंची पार केली होती. मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक