शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

हवामान बदलाचा कडूलिंबासह द्राक्ष आणि काजूलाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 07:00 IST

Nagpur News हवामान बदलाच्या कारणामुळे ‘ टि माॅस्किटाे बग ’ नामक कीटकाला अनुकूल वातावरण मिळाले असून, कडूलिंबासह काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरूला ही याचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष संशाेधकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकीटकासाठी अनुकूल वातावरण

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या काही दिवसांत विदर्भासह दक्षिण भारतात कडूलिंबाची झाडे सुकत जाण्याच्या कारणामुळे वनस्पती शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. हवामान बदलाच्या कारणामुळे ‘ टि माॅस्किटाे बग ’ नामक कीटकाला अनुकूल वातावरण मिळाले असून, कडूलिंबासह काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरूला ही याचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष संशाेधकांनी व्यक्त केला आहे.

नागपूरसह विदर्भात कडूलिंबाच्या झाडांवर राेगाचा प्रादुर्भाव हाेत असून, झाडे मरायला लागल्याचे वृत्त ‘लाेकमत’ ने प्रकाशित केले हाेते. ट्राॅपिकल फाॅरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. पी. बी. मेश्राम यांनी यावर प्रकाश टाकला. ‘ टि-माॅस्किटाे ’ हा मूळत: चहावर प्रादुर्भाव करणारा कीटक आहे. शिवाय काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरू हेही या कीटकाचे ‘हाेस्ट ’ आहेत. सध्या या कीटकाने कडूलिंबाला लक्ष्य केले आहे.

हा उपाय प्रभावी

प्राेफेनफाॅस किंवा लॅमडा सायलाेथ्रील २० मिली. साेबत बाविस्टीन किंवा कार्बेनडॅझिन पावडर २० ग्रॅम यांचे १० लिटर पाण्यामध्ये मिश्रण करावे. हे मिश्रण आजारी झाडावर दूर राहून फवारणी करावे. उरलेले मिश्रण आरा तयार करून बुंध्याजवळ टाकावे. यामुळे टि माॅस्किटाे बग आणि बुरशीवर नियंत्रण मिळेल.

लाळेतील विषद्रव्यांमुळे वाळतात झाडे

टि-माॅस्किटाे हा कीटक झाडाची काेवळी पाने नाही तर शेंड्यामधून रस पितात. मात्र या प्रक्रियेत ते लाळेद्वारे विषारी द्रव्य साेडतात. त्यामुळे फांद्यांना जखम हाेते व त्यातून गाेंद निघताे. तेवढा भाग नंतर काळपट पडताे. त्यावर बुरशी तयार हाेते. या बुरशीमुळे मुळातील अन्नद्रव्य पाने, फांद्यांपर्यंत पाेहोचणे बाधित हाेते. त्यामुळे झाडे सुकतात व मृत हाेत असल्याचे डाॅ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती