शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:00 IST

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्देकेवळ ७८०० नागरिकांनीच नोंदविले मत : विदर्भात चंद्रपूर प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणातून गावातील स्वच्छता, स्वच्छतेशी निगडित कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यावर रँकिंग देण्यात येणार आहे. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व संस्थात्मक ठिकाण आदीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रा.पं. चे पदाधिकारी यांच्यात असलेली तळमळ, त्यांचे मत नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने ‘एसएसजी-१८’ हे अ‍ॅप तयार केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून, स्वच्छतेबाबत आपले अभिप्राय त्यात द्यायचे आहे. यामध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले आहे. त्याच उत्तर नागरिकांना द्यायचे आहे. या निकषाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यांचे आणि राज्यातील स्वच्छतेचे स्थान आणि क्रमवारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्य यांना २ आॅक्टोबर रोजी पुरस्कृत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अख्खे प्रशासन कामी लागले होते. शाळा, ग्रा.पं. मध्ये त्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. असे असतानाही नागपूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.विदर्भात नागरिकांनी जिल्हानिहाय नोंदलेली मतं (२९ आॅगस्टपर्यंत)चंद्रपूर - ३९१००बुलडाणा - ३०५१७गोंदिया - १९७४०अमरावती - १३८०८वर्धा - ११९६९नागपूर - ७७९३भंडारा - ७४८९गडचिरोली - ४१४५यवतमाळ - ३२८५अकोला - ३०८८वाशिम - २८७६

टॅग्स :nagpurनागपूर