शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:00 IST

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्देकेवळ ७८०० नागरिकांनीच नोंदविले मत : विदर्भात चंद्रपूर प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणातून गावातील स्वच्छता, स्वच्छतेशी निगडित कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यावर रँकिंग देण्यात येणार आहे. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व संस्थात्मक ठिकाण आदीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रा.पं. चे पदाधिकारी यांच्यात असलेली तळमळ, त्यांचे मत नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने ‘एसएसजी-१८’ हे अ‍ॅप तयार केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून, स्वच्छतेबाबत आपले अभिप्राय त्यात द्यायचे आहे. यामध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले आहे. त्याच उत्तर नागरिकांना द्यायचे आहे. या निकषाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यांचे आणि राज्यातील स्वच्छतेचे स्थान आणि क्रमवारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्य यांना २ आॅक्टोबर रोजी पुरस्कृत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अख्खे प्रशासन कामी लागले होते. शाळा, ग्रा.पं. मध्ये त्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. असे असतानाही नागपूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.विदर्भात नागरिकांनी जिल्हानिहाय नोंदलेली मतं (२९ आॅगस्टपर्यंत)चंद्रपूर - ३९१००बुलडाणा - ३०५१७गोंदिया - १९७४०अमरावती - १३८०८वर्धा - ११९६९नागपूर - ७७९३भंडारा - ७४८९गडचिरोली - ४१४५यवतमाळ - ३२८५अकोला - ३०८८वाशिम - २८७६

टॅग्स :nagpurनागपूर