शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपूर सिटी अ‍ॅपवरील दहा हजार तक्रारी सोडविल्याचा दावा खोटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 10:11 IST

मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी व नगरसेवकांचा आक्षेपनिधीच नाही तर कामे कशी केली?

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना महापालिकेच्या संबंधित काम वा तक्रार देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे तात्काळ समाधान होत आहे. मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर प्रशासनाचा हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली. कुठल्या कामावर किती खर्च झाला, हा खर्च कशातून केला, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे. आधीच पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष सुरू असताना तक्रारीच्या मुद्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.सिवर लाईन,चेंबर व नाल्या दुरुस्ती, पाण्याची लाईन दुरुस्ती, अशा स्वरूपाच्या तब्बल ४१९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील ३५२० तक्रारी सोडवल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु नाल्या, चेंबर दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध नसताना दुरुस्ती कशी केली, असा सवाल नगरसेवकांनी केला आहे. बांधकाम विभागाकडे रस्ते, डांबरीकरणासंदर्भात १३७६ तक्रारी आल्या. रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे ठप्प असताना या तक्रारी सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यात तथ्य नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण विभागाकडे ५२६ तक्रारी आल्या. यातील ४५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या. परंतु मागील तीन महिन्यात अतिक्रमण कारवाई जवळपास बंद आहे.नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी करण्याची सोय अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. यावर आयुक्तांचे नियंत्रण असून अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे निराकरण निर्धारित कालावधीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाते.नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारी सोडविल्या जात नाहीत. मी स्वत: माझ्याकडे आलेल्या १ हजाराहून अधिक तक्रारी दिल्या. आजवर त्या सोडविल्या नाहीत. आॅनलाईन तक्रारीला प्राधान्य दिले जात आहे. मग नगरसेवक नागरिकांच्या तक्रारी कशा सोडवतील? मनपा प्रशासन १० हजाराहून अधिक तक्रारी सोडविल्याचा दावा करीत आहे. पैसेच नाही तर त्या कशा सोडविल्या, खर्च कसा आणि कोठून केला, याची प्रशासनाने तक्रारनिहाय माहिती दिली तर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समितीगडर, चेंबर व नाली दुरुस्ती अशी लहानसहान कामे सांगितली तर झोन स्तरावर पैसे नाहीत असे सांगितले जाते. आम्ही सुचविलेली अत्यावश्यक कामे होत नाहीत. पैसे नसताना मनपा प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी तातडीने कशा सोडविल्या, हा संशोधनाचा विषय आहे. तक्रारीच्या माध्यमातून नेमकी कोणती कामे केली व किती खर्च झाला याची माहिती उपलब्ध केली तर आक्षेप घेण्याची गरज पडणार नाही.संजय महाकाळकर, नगरसेवकआयुक्त मुंढेंच्या माध्यमातून काँग्रेसची मक्तेदारीराज्य सरकार बदलले आणि सूडाचे राजकारण सुरू झाले. मनपाचे प्रशासन वादात आहे. तुकाराम मुंढे आल्यापासून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचे सत्र सुरू आहे. एकतर्फी कारभार, स्वत:च निर्णय घेणे सुरू आहे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांना भेटीची परवानगी नाकारण्यात येते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांनी घेतलेल्या लोकहिताचे निर्णय फिरवण्यात आले. मुंढे हे सत्ताधाºयांची लाचारी पत्करून काम करताहेत. एकप्रकारे मुंढेंच्या माध्यमातून महापालिकेत काँग्रेसची मक्तेदारी सुरू आहे.गिरीश व्यास

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका