शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वाहक न मिळाल्याने नागपूर शहर बसला २.६१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:14 IST

चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सची मनमानी यामुळे वाहकचा अभाव बससेवा सुरळीत चालविण्यात बाधा ठरत आहे.

ठळक मुद्देवर्षभरात ४० हजार फेऱ्या बाधित : प्रावाशांचीही झाली गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सची मनमानी यामुळे वाहकचा अभाव बससेवा सुरळीत चालविण्यात बाधा ठरत आहे.शहरात सध्या ३७५ बसेस धावत असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु प्रत्यक्षात उभ्या असलेल्या बसेस चालविण्यासाठी वाहक उपलब्ध न केल्याने रविवारी बसेसच्या ५० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारीसुद्धा २५ ते ३० फेऱ्या होऊ शकल्या नाही.बसेस न धावल्याने तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होतो. शहरात तीन रेड बस आॅपरेटर व एक ग्रीन बस आॅपरेटर आहे. सध्या २५ ग्रीन बसेस धावत आहेत. शहर बससेवेतील रेड बसेसमधून दररोज १.७५ ते १.८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. प्रति किलोमीटरच्या आधारावर बस आॅपरेटरला महापालिके ला आर्थिक मोबदला द्यावा लागतो. मात्र तिकिटाची रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा केली जाते. बस वाहकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी डिम्ट्स कंपनीवर आहे. एसआयएस व युनिटी कंपनीमार्फ त वाहकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहर बससेवेत १८०० वाहक आहेत. त्यांची डिम्टस्च्या माध्यमातून विविध मार्गावर नियुक्ती के ली जाते. वाहकांनी तिकिटांच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम महापालिके च्या खात्यात जमा केली जाते. विना वाहक बसेस धावल्या तर ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होत नाही.परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनीही वाहक उपलब्ध होत नसल्याला दुजोरा दिला. यासंदर्भात डिम्ट्सला नोटीस बजावून खुलासा मागविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले.कधी संप तर कधी मनमानीकधी संप तर कधी डिम्ट्स कंपनीमुळे शहर बसला वाहक उपलब्ध झाले नाही. यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी खाली उतरतात. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आर.के.सिटी बस सर्व्हिसेसला वाहक न मिळाल्याने १६५३२७ कि.मी.चे संचालन प्रभावित झाले. यामुळे ८२.६६ लाखांचे नुकसान झाले. हंसा सिटी बस सर्व्हिसेस यांना वाहक न मिळाल्याने १८६२०६ कि. मी.चे संचालन करता आले नाही. यामुळे ८८.३३ लाखांचे तर ट्रॅव्हल टाईमला ९०.५६ लाखांचे नुकसान झाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक