शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या धर्तीवर विदर्भात होणार ‘सिट्रस इस्टेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:45 IST

संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात घोषणालोकमतच्या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हल’चे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली. यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. लोकमतच्या पुढाकाराने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हल’चे हे फलित आहे. या फेस्टीव्हलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सुचविले होते.पंजाबमध्ये ६० हजार हेक्टरवर संत्र्याच्या किन्नो जातीची लागवड आहे. तेथे प्रति हेक्टर २१ टन उत्पादन होते. विदर्भात मात्र ही उत्पादकता ६ ते ७ टन आहे. पंजाबमध्ये ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना संत्रा कलम तयार करण्यापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन केले जाते, मदत दिली जाते. त्याच धर्तीवर विदर्भातही मदत व्हावी म्हणून गेल्या सात-आठ वर्षांपासून महाआॅरेंज प्रयत्न करीत आहे. लोकमतच्या पुढाकाराने नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टीवलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाआॅरेंजच्या संबंधित प्रस्तावावर विचार करण्याची सूचना केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व अर्थसंकल्पात ‘सिट्रस इस्टेट’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.पतंजलीचा फळ प्रक्रिया प्रकल्प नागपुरात लवकरच सुरू होत आहे. यासाठी त्यांना फळांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागणार आहे.

सिट्र्स इस्टेटमध्ये काय होणार ?संत्रा लागवड असलेल्या जिल्ह्यांमध्ये संत्र्यांच्या दर्जेदार कलमांची निर्मिती करणे, नवीन जाती विकसित करणे, रोग प्रतिबंधक करण्याविषयी मार्गदर्शन, चांगल्या उच्च दर्जाच्या फळांची निर्मिती, त्याचे ग्रेडिंग व कोटिंग, विक्री व्यवस्थापनास मार्गदर्शन ही जबाबदारी ‘सिट्रस इस्टेट’ कडून पार पाडली जाईल. यात शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल. त्यामुळे संत्र्याचा दर्जा व उत्पादनातही वाढ होईल.

संत्रा उत्पादनात क्रांती होईलराज्य सरकारने विदर्भात सिट्रस इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने येथे संत्रा उत्पादनात मोठी क्रांती होईल. याचा लाभ संत्रा उत्पादकांना होईल. यामुळे जगात प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्याची गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल. अलिकडच्या काळात संत्र्यासाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.- श्रीधरराव ठाकरे,अध्यक्ष, महाआॅरेंज

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल