शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

दूषित पाण्यामुळे नागरिकांचा उद्रेक

By admin | Updated: May 16, 2014 00:51 IST

पाचपावली येथील गोंडपुरा भागात मागील काही दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी दूषित पाणी घेऊन गुरुवारी सतरंजीपुरा येथील

नागपूर : पाचपावली येथील गोंडपुरा भागात मागील काही दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी दूषित पाणी घेऊन गुरुवारी सतरंजीपुरा येथील ओसीडब्ल्यू कार्यालयावर धडक दिली आणि अधिकार्‍यांच्या समोरच दूषित पाणी ओतून समस्येकडे लक्ष वेधले.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाचपावली परिसरातील गोंडपुरा वस्तीमध्ये नळामधून दूषित पाणी येत आहे. दररोज दुपारी १२ वाजता त्यांच्या वस्तीत नळ येतो. परंतु नळ सुरू करताच दूषित पाणी येते. तब्बल ४ तास दूषित पाणी जाऊ दिल्यानंतर नळाला कापड लावून पाणी भरावे लागते. यानंतरही त्याच्यातील दूषितपणा जात नाही. पाण्यात फिटकरी टाकावी लागते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वस्तीतील महिला ज्युली उके, मंदा मसराम, माया उईके, काजल गेडाम आदी महिला आजारी पडल्या आहेत. या परिसरातील नागरिकांनी बहुतांश यासंबंधात अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या परंतु काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी दूषित पाणी बॉटलमध्ये भरले आणि ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना आपली समस्या समजावून सांगत त्यांच्यासमोरच दूषित पाणी ओतले. अधिकार्‍यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. येत्या दोन दिवसात समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन बिसेन यांच्यासह अमित उके, गोपाल वाणी, सुरज उके, नितेश गेडाम, रवी मसराम, सचिन उके, धवन आतराम, पंकज हटवार आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होते. (प्रतिनिधी)