शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चीनने भारतासह तिबेटचा विश्वासघातच केला : आनंदकुमार यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:26 IST

भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.

ठळक मुद्देचीनचा साम्राज्यवाद खेदजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हिंदी-चिनी भाई भाई’ अशा घोषणा जगभर भारताकडून पसरविण्यात आल्यावरही चीनचाभारताबद्दलचा भाव बदलला नाही. पुढे चीनसाठी भारताचे प्रवेशद्वार असलेल्या तिबेटवर ताबा मिळवून आतंरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाब टाकणे सुरू ठेवले. भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्र आणि भारत तिबेट मैत्री संघाच्या वतीने डॉ. आनंदकुमार यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगाच्या पाठीवर विदेशी साम्राज्य संपत असताना चीनच्या साम्राज्यवादाचा उदय होणे हे खेदजनक आहे. १९६८ मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळविला. त्या प्रांतामध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसह अनेक प्रकल्प सुरू करून तिबेटी जनतेला प्रदूषणाच्या खाईत लोटले. तिबेटी जनतेने जीवापाड जपलेली वनसंपदा, जलसंपदा चीनने नष्ट केली. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. भारतामधील प्रवेशासाठी तिबेट चीनकरिता प्रवेशद्वार असल्याचे लक्षात आल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र उभारणी केली.तिबेटमधील जनतेला शिक्षण, संस्कृती, धन, खानपान यात स्वातंत्र्य हवे आहे. दलाई लामा भारतभर आणि जगभर फिरून तिबेटींच्या स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत. मात्र चीन कूटनीतीने वागत आहे. तेथील जनतेवर अन्याय करीत आहे. तिबेटी तरुणींसोबत चीनचे पुरुष बळजबरीने विवाह करून नवा समुदाय निर्माण करू पहात आहेत. जगाच्या दृष्टीने ही खेदाची बाब आहे. दलाई लामा यांनी अद्यापही आपले काम थांबविलेले नाही. शांती, सुखाच्या मार्गावरून बुद्ध विचार प्रसृत व्हावा, ही त्यांची कामना आहे. स्वतंत्र झाल्यावर चीनला शत्रू मानणार नाही. शस्त्रांवर विश्वास ठेवणार नाही, तर शांती हाच मार्ग आहे, असे ते म्हणतात.भारत नेहमीच तिबेटच्या बाजूने उभा राहिला आहे. जे.पी. नारायण, राममनोहर लोहिया, इंद्रजित गुप्ता, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेकांनी तिबेट बचावसाठी हिमालय बचावचा संदेश दिला आहे. हिमालयाला सांस्कृतिक अस्मिता आहे. ती वाचविण्यासाठी सर्वांनी आवाज बुलंद करण्याची गरज आहे.प्रारंभी डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्राचे अध्यक्ष हरीश अड्याळकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय सीताराम साहू यांनी करून दिला. तर भारत-तिबेट मैत्री संघाचे सचिव सचिन रामटेके यांनी आभार मानले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत