शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

चीनने भारतासह तिबेटचा विश्वासघातच केला : आनंदकुमार यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:26 IST

भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.

ठळक मुद्देचीनचा साम्राज्यवाद खेदजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हिंदी-चिनी भाई भाई’ अशा घोषणा जगभर भारताकडून पसरविण्यात आल्यावरही चीनचाभारताबद्दलचा भाव बदलला नाही. पुढे चीनसाठी भारताचे प्रवेशद्वार असलेल्या तिबेटवर ताबा मिळवून आतंरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाब टाकणे सुरू ठेवले. भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्र आणि भारत तिबेट मैत्री संघाच्या वतीने डॉ. आनंदकुमार यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगाच्या पाठीवर विदेशी साम्राज्य संपत असताना चीनच्या साम्राज्यवादाचा उदय होणे हे खेदजनक आहे. १९६८ मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळविला. त्या प्रांतामध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसह अनेक प्रकल्प सुरू करून तिबेटी जनतेला प्रदूषणाच्या खाईत लोटले. तिबेटी जनतेने जीवापाड जपलेली वनसंपदा, जलसंपदा चीनने नष्ट केली. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. भारतामधील प्रवेशासाठी तिबेट चीनकरिता प्रवेशद्वार असल्याचे लक्षात आल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र उभारणी केली.तिबेटमधील जनतेला शिक्षण, संस्कृती, धन, खानपान यात स्वातंत्र्य हवे आहे. दलाई लामा भारतभर आणि जगभर फिरून तिबेटींच्या स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत. मात्र चीन कूटनीतीने वागत आहे. तेथील जनतेवर अन्याय करीत आहे. तिबेटी तरुणींसोबत चीनचे पुरुष बळजबरीने विवाह करून नवा समुदाय निर्माण करू पहात आहेत. जगाच्या दृष्टीने ही खेदाची बाब आहे. दलाई लामा यांनी अद्यापही आपले काम थांबविलेले नाही. शांती, सुखाच्या मार्गावरून बुद्ध विचार प्रसृत व्हावा, ही त्यांची कामना आहे. स्वतंत्र झाल्यावर चीनला शत्रू मानणार नाही. शस्त्रांवर विश्वास ठेवणार नाही, तर शांती हाच मार्ग आहे, असे ते म्हणतात.भारत नेहमीच तिबेटच्या बाजूने उभा राहिला आहे. जे.पी. नारायण, राममनोहर लोहिया, इंद्रजित गुप्ता, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेकांनी तिबेट बचावसाठी हिमालय बचावचा संदेश दिला आहे. हिमालयाला सांस्कृतिक अस्मिता आहे. ती वाचविण्यासाठी सर्वांनी आवाज बुलंद करण्याची गरज आहे.प्रारंभी डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्राचे अध्यक्ष हरीश अड्याळकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय सीताराम साहू यांनी करून दिला. तर भारत-तिबेट मैत्री संघाचे सचिव सचिन रामटेके यांनी आभार मानले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत