शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

चीनने भारतासह तिबेटचा विश्वासघातच केला : आनंदकुमार यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:26 IST

भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.

ठळक मुद्देचीनचा साम्राज्यवाद खेदजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हिंदी-चिनी भाई भाई’ अशा घोषणा जगभर भारताकडून पसरविण्यात आल्यावरही चीनचाभारताबद्दलचा भाव बदलला नाही. पुढे चीनसाठी भारताचे प्रवेशद्वार असलेल्या तिबेटवर ताबा मिळवून आतंरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाब टाकणे सुरू ठेवले. भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्र आणि भारत तिबेट मैत्री संघाच्या वतीने डॉ. आनंदकुमार यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगाच्या पाठीवर विदेशी साम्राज्य संपत असताना चीनच्या साम्राज्यवादाचा उदय होणे हे खेदजनक आहे. १९६८ मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळविला. त्या प्रांतामध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसह अनेक प्रकल्प सुरू करून तिबेटी जनतेला प्रदूषणाच्या खाईत लोटले. तिबेटी जनतेने जीवापाड जपलेली वनसंपदा, जलसंपदा चीनने नष्ट केली. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. भारतामधील प्रवेशासाठी तिबेट चीनकरिता प्रवेशद्वार असल्याचे लक्षात आल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र उभारणी केली.तिबेटमधील जनतेला शिक्षण, संस्कृती, धन, खानपान यात स्वातंत्र्य हवे आहे. दलाई लामा भारतभर आणि जगभर फिरून तिबेटींच्या स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत. मात्र चीन कूटनीतीने वागत आहे. तेथील जनतेवर अन्याय करीत आहे. तिबेटी तरुणींसोबत चीनचे पुरुष बळजबरीने विवाह करून नवा समुदाय निर्माण करू पहात आहेत. जगाच्या दृष्टीने ही खेदाची बाब आहे. दलाई लामा यांनी अद्यापही आपले काम थांबविलेले नाही. शांती, सुखाच्या मार्गावरून बुद्ध विचार प्रसृत व्हावा, ही त्यांची कामना आहे. स्वतंत्र झाल्यावर चीनला शत्रू मानणार नाही. शस्त्रांवर विश्वास ठेवणार नाही, तर शांती हाच मार्ग आहे, असे ते म्हणतात.भारत नेहमीच तिबेटच्या बाजूने उभा राहिला आहे. जे.पी. नारायण, राममनोहर लोहिया, इंद्रजित गुप्ता, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेकांनी तिबेट बचावसाठी हिमालय बचावचा संदेश दिला आहे. हिमालयाला सांस्कृतिक अस्मिता आहे. ती वाचविण्यासाठी सर्वांनी आवाज बुलंद करण्याची गरज आहे.प्रारंभी डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्राचे अध्यक्ष हरीश अड्याळकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय सीताराम साहू यांनी करून दिला. तर भारत-तिबेट मैत्री संघाचे सचिव सचिन रामटेके यांनी आभार मानले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत