शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचा कोंडतोय ‘श्वास’

By admin | Updated: December 11, 2015 03:37 IST

बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे.

मेडिकलमध्ये पाच वर्षांत २३५६ नवजात शिशुंचा मृत्यू : रेफर केलेल्या बालकांसाठी ‘एनआयसीयू’च नाहीसुमेध वाघमारे नागपूरबालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. आरोग्यासाठी मोठा निधी देत आहे. ग्रामीण भागांत मृत्यूदर रोखण्यात शासनाला काही प्रमाणात यशही आले आहे, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चित्र याच्या उलट आहे. गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच दिवसांतील २ हजार ३५६ नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. या चिमुकल्यांच्या कोंडणाऱ्या श्वासामागे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आणि अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेरून येणाऱ्या नवजात शिशुंसाठी नसलेले बाल दक्षता कक्ष (एनआयसीयू) हे कारण ठरत आहे. मेडिकलमध्ये बालरोग विभागात ३, ५ व ६ असे तीन वॉर्ड आणि ३० खाटांचे ‘एनआयसीयू’ आहे. विशेष म्हणजे, एनआयसीयूमध्ये फक्त मेडिकलमध्ये प्रसुती झालेल्या मातांचे शिशू ठेवले जातात. मेयो किंवा इतर रुग्णालयातून कितीही गंभीर अवस्थेत नवजात शिशू आल्यास त्याला या कक्षामध्ये ठेवले जात नाही. त्याच्यावर जनरल वॉर्डात उपचार केले जातात. या वॉर्डात ‘न्युओलेटर व्हेन्टिलेटर’ नाही. मॉनिटर सिस्टीम आहे ती तोकडी आहे. रेडियम वॉर्मर नाही. इन्फुयन पंप नाही. वातानुकूलित यंत्र नाही. फोटोथेरपी नाही. जनरल वॉर्ड असल्याने नवजात शिशूला लवकर संसर्ग होण्याची भीती असते. यामुळे की काय, मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. २०११ मध्ये ५०५, २०१२ मध्ये ४१६, २०१३ मध्ये ४७४, २०१४मध्ये ४७३ तर आॅक्टोबर २०१५ पर्यंत ४८४ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. शासनाने आवश्यक प्रमाणात ही उपकरणे उपलब्ध करून दिली असती तर ही बालके वाचली असती, असे मेडिकलच्याच एका बालरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बाहेरून आलेले शिशू एनआयसीयू’मध्ये ठेवण्यासाठी १०० खाटांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. ३० खाटांची क्षमता असलेल्या ‘एनआयसीयू’मध्ये केवळ मेडिकलमध्ये जन्माला आलेली नवजात बालके ठेवली जातात. या खाटाही त्यांच्यासाठी कमी पडत असल्याने अनेकवेळा एका खाटेवर दोन बालकांंवर उपचार केला जातो. परंतु येथेही उपकरणांच्या तुटवड्यामुळे चिमुकल्यांच्या जीवावर बेतते. १० ‘न्युओलेटर व्हेन्टिलेटर’ची गरज असताना केवळ तीन आहेत. कावीळ झालेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले फोटोथेरपी उपकरणांची दहाची गरज असताना तेही तीनच आहेत, मॉनिटर सिस्टीम व वॉर्मरची संख्याही तोकडी आहे. इन्फुयन पंपची १० गरज असताना केवळ सहाच सुरू आहेत. यातील काही उपकरणे तर बंद स्थितीत आहे. याचा परिणाम, चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत असून या कक्षातून ती बाहेर आल्यास त्यांचा दुसरा जन्मच ठरत आहे.