शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

विजेची तार पडून असल्याची वारंवार माहिती देऊनही एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. एसएनडीएलच्या हलगर्जीपणामुळे एका सात वर्षांच्या बालकाचा करुण अंत झाला.

नागरिक संतप्त : एसएनडीएलमधील दोषींवर कारवाईची मागणी नागपूर : विजेची तार पडून असल्याची वारंवार माहिती देऊनही एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. एसएनडीएलच्या हलगर्जीपणामुळे एका सात वर्षांच्या बालकाचा करुण अंत झाला. आदित्य धर्मपाल यादव असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे एसएनडीएल विरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दूध विक्रेता धर्मपाल यादव यांचा परिवार आरबीआय अधिकारी वसाहतीजवळ राहातो. त्यांना सात वर्षांचा आदित्य आणि नऊ वर्षांची मिनू ही मुले. धर्मपाल यांचे नातेवाईक बाजूलाच काही अंतरावर राहतात. चुणचुणीत आदित्य यादव परिवारातील सर्वांचाच लाडका. त्यामुळे तो आपल्या सर्वच नातेवाईकांकडे जात येत होता. रविवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास आदित्य आपल्या आजीकडून चॉकलेट घेऊन घराकडे निघाला. अधिकारी वसाहतीजवळ विजेची तार (अर्थिंग केबल) दोन दिवसांपासून तुटून पडली होती. त्याची एसएनडीएलच्या कार्यालयात सूचनाही देण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणे दुर्लक्षित करणाऱ्या एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडेही दुर्लक्ष केले. परिणामी ती केबल तशीच पडून राहिली. निरागस आदित्यला त्याची जाण नसल्यामुळे तो तारेच्या जवळून गेला. संपर्क होताच आदित्यला जोरदार करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत घटनास्थळी जमले. त्यांनी एसएनडीएलच्या कार्यालयात घटनेची माहिती कळवली. मात्र, बऱ्याच विलंबानंतर एसएनडीएलची मंडळी घटनास्थळी पोहचली. त्यामुळे शोकसंतप्त जमावाने एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला. शोकाकूल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही शोकसंतप्त जमावाने आदित्यच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एसएनडीएलच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)