शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपूरनजीक  पिटेसूरमध्ये रोखला बालविवाहाचा विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 22:39 IST

Child marriage ritual stopped पिटेसूर गावात शनिवारी सकाळी बालसंरक्षण पथकाने धडक देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचा विधी रोखला.

ठळक मुद्देसूचना मिळताच पोलीस पथकाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पिटेसूर गावात शनिवारी सकाळी बालसंरक्षण पथकाने धडक देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचा विधी रोखला. अशा तऱ्हेने पथकाने गेल्या नऊ महिन्यांत नऊ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. यावेळी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना समज देत मुलीचा विवाह १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले.

शनिवारी सकाळी बालसंरक्षण निरीक्षक मुश्ताक पठाण यांना पिटेसूर गावात अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असल्याची सूचना मिळाली. तत्काळ या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार माणकापूर पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, बालसंरक्षण अधिकारी पठाण, विनोद शेंडे, सुजाता गुल्हाणे, ग्रामविकास अधिकारी इंद्रपाल ढोकणे, सरपंच दीपक राऊत, अंगणवाडीसेविका उमा उईके, सामाजिक कार्यकर्ता सुनील ठाकरे, मोहम्मद हफिज यांचे पथक सकाळी ११.३० वाजता पिटेसूर गावात विवाहस्थळी पोहोचले. घटनास्थळावर नातेवाइकांनी पथकाशी वादविवाद घालण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी नातेवाइकांना १८ वर्षांखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर असल्याची समज दिली. त्यानंतर कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले.

बालगृहात निवासाची व्यवस्था

बालसंरक्षण पथक पोहोचल्यानंतर विवाह सोहळ्यात सहभागी नातेवाइकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा विवाह नव्हे तर साक्षगंध पार पडत असल्याचा बनाव करण्यात आला. अल्पवयीन मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिचा विवाह करण्याची शंका उत्पन्न झाल्याने, त्या मुलीची राहण्याची व्यवस्था बालगृहात करण्यात आली आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी