शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:51 IST

शासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणाऱ्या  जिल्ह्यातील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनांचा प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्ण बोजवारा उडाला आहे. ४४ योजनांपैकी ३ वर्षात फक्त ४ योजना पूर्ण होऊ शकल्या.

ठळक मुद्दे३ वर्षात ४४ पैकी केवळ ४ योजना पूर्णकारवाईचा इशारा१७ ला होणार नागपुरात अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

आॅनलाईन लोकमतनागपूर : शासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणाऱ्या  जिल्ह्यातील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनांचा प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्ण बोजवारा उडाला आहे. ४४ योजनांपैकी ३ वर्षात फक्त ४ योजना पूर्ण होऊ शकल्या.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय उदासीनतेचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत. येत्या १७ डिसेंबर रोजी या संदर्भात सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावण्याचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना ही बाब लक्षात आली. कामठी तालुक्यातील रनाळा येरखेडा ही मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेमधील योजना ३ वर्षांपासून पूर्ण झाली नाही. या सर्व कामांबद्दल पालकमंत्र्यांनी असमाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील १२ योजनांची बैठक पालकमंत्री मुंबईत लावणार आहेत. या योजनांचे प्रस्ताव येत्या सोमवारी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.महादुला पाणीपुरवठा योजना ही मजिप्राची योजना आहे. या योजनेसाठी महानिर्मितीकडून ५ लाख लिटर पाण्याची व्यवस्था करून दिल्यानंतर अधिकारी अजून गावकऱ्यांना पुरेसे पाणी देऊ शकले नाही, ही खेदाची बाब आहे. लोकांनी मीटर काढून ठेवले. मजिप्राचे अधिकारी पाणीपट्टीची वसुली करीत नाही. त्यामुळे ही योजना तोट्याात सुरु आहे. या योजनेमध्ये येणारा तोटा हा प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीन कारभारामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांद्री व नांदागोमुख या योजनाही अधिकारी मंजूर करवून आणू शकले नाही. गोधनी या गावाच्या योजनेला शहरातून पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पाहता शहराशेजारील गावांना पाणीपुरवठा करण्याच्या अटीवरच महापालिकेला आरक्षण वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला गोधनीला पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्याचे निर्देश मजिप्राच्या अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर