शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:51 IST

शासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणाऱ्या  जिल्ह्यातील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनांचा प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्ण बोजवारा उडाला आहे. ४४ योजनांपैकी ३ वर्षात फक्त ४ योजना पूर्ण होऊ शकल्या.

ठळक मुद्दे३ वर्षात ४४ पैकी केवळ ४ योजना पूर्णकारवाईचा इशारा१७ ला होणार नागपुरात अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

आॅनलाईन लोकमतनागपूर : शासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणाऱ्या  जिल्ह्यातील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनांचा प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्ण बोजवारा उडाला आहे. ४४ योजनांपैकी ३ वर्षात फक्त ४ योजना पूर्ण होऊ शकल्या.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय उदासीनतेचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत. येत्या १७ डिसेंबर रोजी या संदर्भात सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावण्याचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना ही बाब लक्षात आली. कामठी तालुक्यातील रनाळा येरखेडा ही मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेमधील योजना ३ वर्षांपासून पूर्ण झाली नाही. या सर्व कामांबद्दल पालकमंत्र्यांनी असमाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील १२ योजनांची बैठक पालकमंत्री मुंबईत लावणार आहेत. या योजनांचे प्रस्ताव येत्या सोमवारी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.महादुला पाणीपुरवठा योजना ही मजिप्राची योजना आहे. या योजनेसाठी महानिर्मितीकडून ५ लाख लिटर पाण्याची व्यवस्था करून दिल्यानंतर अधिकारी अजून गावकऱ्यांना पुरेसे पाणी देऊ शकले नाही, ही खेदाची बाब आहे. लोकांनी मीटर काढून ठेवले. मजिप्राचे अधिकारी पाणीपट्टीची वसुली करीत नाही. त्यामुळे ही योजना तोट्याात सुरु आहे. या योजनेमध्ये येणारा तोटा हा प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीन कारभारामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांद्री व नांदागोमुख या योजनाही अधिकारी मंजूर करवून आणू शकले नाही. गोधनी या गावाच्या योजनेला शहरातून पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पाहता शहराशेजारील गावांना पाणीपुरवठा करण्याच्या अटीवरच महापालिकेला आरक्षण वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला गोधनीला पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्याचे निर्देश मजिप्राच्या अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर