शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या तळमळीला नोकरशाहीचा खोडा

By admin | Updated: May 31, 2015 02:51 IST

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी समाधान शिबिर आयोजित केले.

नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी समाधान शिबिर आयोजित केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या शिबिरासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला. मात्र, प्रत्यक्ष शिबिरात काहींचेच समाधान झाले, तर अनेकांना निराश होऊन परतावे लागले. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या तळमळीला नोकरशाहीचा खोडा खऱ्या अर्थाने शिबिरात पाहायला मिळाला. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना इकडून तिकडे पाठविले जात होते. सुनावणी होणार असलेल्या कक्षात शिस्तबद्धता नव्हती. अधिकाऱ्यांच्या भोवती तक्रारकर्त्यांचा घोळका होता. अधिकारी-कर्मचारी वरवर तक्रारकर्त्याचे कागदपत्र पाहत होते व योग्य निर्णय घेऊ, असे सांगून वेळ मारून नेत होते. अधिकाऱ्यांच्या अशा भूमिकेमुळे अनेकांना न्याय न मिळताच परतावे लागले. निराश होऊन परतणारे लोक मुख्यमंत्री, मंत्री कुणीही झाले तरी अधिकारीशाही बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत होते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांना कालबद्ध निर्णय घेण्यास बाध्य करावे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.