शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यपालांमुळे महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 12:40 IST

भाजप नेत्यांमध्येदेखील निश्चितच संताप आहे. मात्र, ते बोलू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले

नागपूर : मी अनेक वर्षे राजकारणात आहे. मात्र, कधीही कुणी राज्यपालांचा अपमान केल्याचे पाहिले नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्र राज्य व येथील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची मने दुखावली आहेत. यातूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांची वक्तव्ये ही चुकीचीच होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी जी वक्तव्ये केली, यावरून भाजप नेत्यांमध्येदेखील निश्चितच संताप आहे. मात्र, ते बोलू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले.

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर यासाठी अनेकांनी बलिदान दिले. ते लोक अगोदर परत द्यावे; नंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर बोलावे. ६२ वर्षांपासून सीमाप्रश्नावर आंदोलन सुरू आहे. बेळगावच्या लोकांनी कित्येक वेळा महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकप्रतिनिधी निवडून दिले. ते तेथील मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का, असा सवाल भुजबळ यांनी केला.

ओबीसींना २७ टक्के आरक्षणदेखील नाही

मागील मनपा निवडणुकांत प्रभाग रचनेच्या अगोदर खूप चर्चा झाल्या होत्या. प्रभाग रचनेत वारंवार बदल घडविण्यात येत आहे, हे आश्चर्यजनक आहे. लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळत नाही. हा वाद कायमचा संपुष्टात आणला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी