शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यपालांमुळे महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 12:40 IST

भाजप नेत्यांमध्येदेखील निश्चितच संताप आहे. मात्र, ते बोलू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले

नागपूर : मी अनेक वर्षे राजकारणात आहे. मात्र, कधीही कुणी राज्यपालांचा अपमान केल्याचे पाहिले नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्र राज्य व येथील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची मने दुखावली आहेत. यातूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांची वक्तव्ये ही चुकीचीच होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी जी वक्तव्ये केली, यावरून भाजप नेत्यांमध्येदेखील निश्चितच संताप आहे. मात्र, ते बोलू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले.

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर यासाठी अनेकांनी बलिदान दिले. ते लोक अगोदर परत द्यावे; नंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर बोलावे. ६२ वर्षांपासून सीमाप्रश्नावर आंदोलन सुरू आहे. बेळगावच्या लोकांनी कित्येक वेळा महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकप्रतिनिधी निवडून दिले. ते तेथील मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का, असा सवाल भुजबळ यांनी केला.

ओबीसींना २७ टक्के आरक्षणदेखील नाही

मागील मनपा निवडणुकांत प्रभाग रचनेच्या अगोदर खूप चर्चा झाल्या होत्या. प्रभाग रचनेत वारंवार बदल घडविण्यात येत आहे, हे आश्चर्यजनक आहे. लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळत नाही. हा वाद कायमचा संपुष्टात आणला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी