शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘छडी लागे छम छम ’ आता होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:03 IST

छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्थैर्य राखण्यासाठी विभागाचा निर्णयराष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.गृहपाठ केला नाही, शाळेत दंगा केला, अभ्यास केला नाही, पाढे पाठ केले नाहीत, अशा विविध कारणांसाठी अंगठे धरायला लावणे, भिंतीला खुर्चीसारखे उभे करणे, यासह हातावर छम छम छड्याही पडायच्या. मुलांचा हात रक्तबंबाळ होत असे. पण त्याची पर्वा शिक्षकांना नसे. त्या काळातील शिक्षक मारकुटे होते, तरी त्यांचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमही होतं. आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे, आपल्या घराचे, गावाचे, देशाचे नाव मोठे करावे, असे त्यांना वाटत असे. त्यामुळेच मार खाल्लेल्या त्या विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची ओढ कायमच असायची. तेव्हा पालकही शिक्षकांनी मारहाण केली तरी शिक्षकाला जाब विचारायला जात नसत. विशेष म्हणजे तेव्हा मारकुटा मास्तर म्हणजे अधिक चांगला अशी समजूत होती. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, यावर पालकांचा आणि समाजाचाही विश्वास होता.परंतु कालांतराने शिक्षणाच्या पद्धतीत बदल करण्यात आले. आनंददायी शिक्षणाची नवी परंपरा सुरू झाली. मुलांना शाळेबद्दल ओढ लागायला हवी, त्यांना शाळेत जावेसे वाटावे, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागावे, अशी सरकारच्या शिक्षण खात्याची अपेक्षा आहे. त्यातच २००९ मध्ये लागू झालेल्या बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातच बालकांना शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सुद्धा गुरुजींच्या छडीवर आक्षेप घेतला आहे. आनंददायी शिक्षणाच्या नादात शिक्षण विभागाने गुरुजींच्या हातची छडीही गायब केली आहे.शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमधून छडी वगळण्याच्या आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. विद्यार्थ्यांमधील धाक संपेलआजचा विद्यार्थी तांत्रिक झाला आहे. कॉम्प्युटर, मोबाईल यात त्याचा सर्वाधिक वेळ जात आहे. पालकांवर चिडचिड करायला लागला आहे. आनंददायी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षकांची भीतीही हरविली आहे. गुरुजींची छडी ही मारण्यासाठी नव्हतीच, तो धाक होता, जो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. छडी गायब केल्याने हा धाकच संपणार आहे.सपन नेहरोत्रा, शिक्षक

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी