शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार; एनटीसीएकडून १४ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:46 IST

Nagpur News जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आणणार

संजय रानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत. एनटीसीएने (नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन ऑथोरिटी) प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. देशाच्या वन्यजीव इतिहासातील हे एक मोठे पाऊल राहणार आहे.

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशात चित्ते परत येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एनटीसीएचे वन उपमहानिरीक्षक राजेंद्र गारवाड यांनी प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या वर्षासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र १७ मे रोजी दिले आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पहिल्या टप्प्यात जनावरांची आंतरराष्ट्रीय वाहतूक, क्षेत्रीय देखरेख व लॉजिस्टिक, कुंपण, क्षमतावर्धन इत्यादींचा समावेश राहणार आहे. चालू आर्थिक वर्षातील वार्षिक योजना केवळ प्राधान्यक्रमातील बाबींपुरती मर्यादित असेल असेदेखील कुमार यांनी स्पष्ट केले.

दक्षिण अफ्रिकेचे तज्ज्ञ व्हिन्सेंट यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी कुनो पालपूर नॅशनल पार्कला भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात १४ प्रौढ जंगली चित्यांना दक्षिण अफ्रिकेतील जंगलांमधून पकडल्या जाईल व त्यांना भारतात पाठविण्यात येईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये ते कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये पोहोचतील. या चित्त्यांना सुरुवातीला पाच चौरस किलोमीटरच्या भागात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती आलोक कुमार यांनी दिली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्य प्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्ये चित्ते आणता येतील का याची चाचपणी केली होती. त्यात कुनो पालपूर नॅशनल पार्क सर्वात योग्य स्थान असल्याचे आढळले. केंद्र शासनाने लुप्तप्राय वन्यजीव ट्रस्ट, मध्यप्रदेश वन विभाग, एनटीसीए आणि भारतीय वन्यजीव संस्था यांना प्रोजेक्ट चित्ताची जबाबदारी दिली आहे.

१९४७ मध्ये झाली होती चित्त्याची अखेरची शिकार

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात एशियाटिक चित्त्यांचे प्रमाण वाढले होते. भारत व मध्यपूर्वेतील देशांत आढळणाऱ्या प्राण्यांत त्यांचा समावेश होता. मात्र त्यानंतर शिकारीमुळे चित्त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागले. १९४७ साली कोरिआ येथे महाराज नामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती.

असा असतो चित्ता

चित्ता हा मूळतः अफ्रिका व मध्य इराणमधील मार्जारकुळातील प्राणी आहे. सर्वात वेगवान प्राणी असलेला चित्ता ८० ते १२८ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असतात. ९३ ते ९८ किलोमीटर प्रतितास या चित्त्याच्या वेगाची वेळ नोंदविण्यात आली आहे. प्रौढ चित्त्यांचे वजन २० ते ६५ किलो दरम्यान असते. चित्त्याचे डोके लहान व गोलाकार असते तर चेहऱ्यावर काळ्या अश्रूंसारखे पट्टे असतात. चित्त्याच्या चार उपप्रजाती शोधण्यात आल्या आहेत. चित्ता व मांजराच्या कुळातील इतर प्राण्यांमधील सर्वात उल्लेखनीय फरक हा असतो की त्यांच्याकडे मागे घेण्यासारखे पंजे असतात. यामुळेच चित्ता वेगाने धावत असतानादेखील जमिनीवर पकड घेऊ शकतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीव