शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार; एनटीसीएकडून १४ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:46 IST

Nagpur News जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आणणार

संजय रानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत. एनटीसीएने (नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन ऑथोरिटी) प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. देशाच्या वन्यजीव इतिहासातील हे एक मोठे पाऊल राहणार आहे.

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशात चित्ते परत येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एनटीसीएचे वन उपमहानिरीक्षक राजेंद्र गारवाड यांनी प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या वर्षासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र १७ मे रोजी दिले आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पहिल्या टप्प्यात जनावरांची आंतरराष्ट्रीय वाहतूक, क्षेत्रीय देखरेख व लॉजिस्टिक, कुंपण, क्षमतावर्धन इत्यादींचा समावेश राहणार आहे. चालू आर्थिक वर्षातील वार्षिक योजना केवळ प्राधान्यक्रमातील बाबींपुरती मर्यादित असेल असेदेखील कुमार यांनी स्पष्ट केले.

दक्षिण अफ्रिकेचे तज्ज्ञ व्हिन्सेंट यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी कुनो पालपूर नॅशनल पार्कला भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात १४ प्रौढ जंगली चित्यांना दक्षिण अफ्रिकेतील जंगलांमधून पकडल्या जाईल व त्यांना भारतात पाठविण्यात येईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये ते कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये पोहोचतील. या चित्त्यांना सुरुवातीला पाच चौरस किलोमीटरच्या भागात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती आलोक कुमार यांनी दिली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्य प्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्ये चित्ते आणता येतील का याची चाचपणी केली होती. त्यात कुनो पालपूर नॅशनल पार्क सर्वात योग्य स्थान असल्याचे आढळले. केंद्र शासनाने लुप्तप्राय वन्यजीव ट्रस्ट, मध्यप्रदेश वन विभाग, एनटीसीए आणि भारतीय वन्यजीव संस्था यांना प्रोजेक्ट चित्ताची जबाबदारी दिली आहे.

१९४७ मध्ये झाली होती चित्त्याची अखेरची शिकार

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात एशियाटिक चित्त्यांचे प्रमाण वाढले होते. भारत व मध्यपूर्वेतील देशांत आढळणाऱ्या प्राण्यांत त्यांचा समावेश होता. मात्र त्यानंतर शिकारीमुळे चित्त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागले. १९४७ साली कोरिआ येथे महाराज नामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती.

असा असतो चित्ता

चित्ता हा मूळतः अफ्रिका व मध्य इराणमधील मार्जारकुळातील प्राणी आहे. सर्वात वेगवान प्राणी असलेला चित्ता ८० ते १२८ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असतात. ९३ ते ९८ किलोमीटर प्रतितास या चित्त्याच्या वेगाची वेळ नोंदविण्यात आली आहे. प्रौढ चित्त्यांचे वजन २० ते ६५ किलो दरम्यान असते. चित्त्याचे डोके लहान व गोलाकार असते तर चेहऱ्यावर काळ्या अश्रूंसारखे पट्टे असतात. चित्त्याच्या चार उपप्रजाती शोधण्यात आल्या आहेत. चित्ता व मांजराच्या कुळातील इतर प्राण्यांमधील सर्वात उल्लेखनीय फरक हा असतो की त्यांच्याकडे मागे घेण्यासारखे पंजे असतात. यामुळेच चित्ता वेगाने धावत असतानादेखील जमिनीवर पकड घेऊ शकतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीव