शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखाचे आमिष दाखवून ग्रामस्थांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:19 IST

बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अभियानाच्या नावावर अपप्रचार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नागपुरसह देशभरात बेटी पढाओ बेटी बचाओ ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना आहे. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, लिंग गुणोत्तर वाढविणे आदी उद्दिष्टे यात ठेवण्यात आली आहे. यासाठी विविध पातळीवर प्रचार-प्रसिध्दी चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येत आहे. परंतु काही मध्यस्थ व काही संस्था या योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची लूबाडणूक करीत असल्याचे लक्षात येत आहे. त्यात अशा व्यक्ती व संस्था मुलींचा नावे अर्ज भरुन घेत, त्यापोटी अर्जाची किंमत व नोंदणी शुल्क वसूल करीत आहे. तसेच मुलींच्या नावे २ लाख रुपयापर्यंत लाभ मिळण्याचे आमिष देत आहे. अशा मौखिक तक्रारी जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदरची योजना ही पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना असून, समाजात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी लोकांची जनजागृती करण्याची ही योजना आहे. यात कुठल्याही प्रकारचा रोख स्वरुपाचा लाभ देण्यात येत नाही. तरी ग्रामीण जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता अशा व्यक्ती संस्थांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन जि.प.च्या महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी भागवत तांबे यांनी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर