शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दोन लाखाचे आमिष दाखवून ग्रामस्थांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:19 IST

बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अभियानाच्या नावावर अपप्रचार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नागपुरसह देशभरात बेटी पढाओ बेटी बचाओ ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना आहे. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, लिंग गुणोत्तर वाढविणे आदी उद्दिष्टे यात ठेवण्यात आली आहे. यासाठी विविध पातळीवर प्रचार-प्रसिध्दी चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येत आहे. परंतु काही मध्यस्थ व काही संस्था या योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची लूबाडणूक करीत असल्याचे लक्षात येत आहे. त्यात अशा व्यक्ती व संस्था मुलींचा नावे अर्ज भरुन घेत, त्यापोटी अर्जाची किंमत व नोंदणी शुल्क वसूल करीत आहे. तसेच मुलींच्या नावे २ लाख रुपयापर्यंत लाभ मिळण्याचे आमिष देत आहे. अशा मौखिक तक्रारी जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदरची योजना ही पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना असून, समाजात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी लोकांची जनजागृती करण्याची ही योजना आहे. यात कुठल्याही प्रकारचा रोख स्वरुपाचा लाभ देण्यात येत नाही. तरी ग्रामीण जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता अशा व्यक्ती संस्थांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन जि.प.च्या महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी भागवत तांबे यांनी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर