शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:22 IST

देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ठळक मुद्देकोमल नाहटा यांचा प्रश्न : गैरप्रकार समोर यायला हवे, मात्र दुरुपयोग नको

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.‘नागपूर प्रेस क्लब’तर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, वरिष्ठ पत्रकार राहुल पांडे उपस्थित होते. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र, या मोहिमेतून अनेकांची नाहक बदनामी होत आहे. याचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेतील सगळेच खरे बोलत आहेत असे नसून अनेक लोक हे ‘बहती गंगा मे’ हात धुण्याचे काम करीत आहेत. यात काहींचे आरोप खरे असले तरी काही मुली केवळ प्रसिद्धी झोतात येणे किंवा बदला घेण्याच्या भावनेने आरोप करीत असल्याचेही ते म्हणाले.चित्रपटांवर परिणाम नाही‘मी टू’ मोहिमेमुळे येणाऱ्या आगामी चित्रपटांवर फारसा परिणाम होणार नाही. प्रेक्षकांना चित्रपटाशी घेणेदेणे असते. चित्रपटाचे कथानक, मांडणी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजन याला महत्त्व असते. त्याचा व्यवसायावर परिणाम होत नाही. ‘मी टू’अंतर्गत आरोप झाले म्हणून उतावीळ होत कलाकारांनी आता मी या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही अशी भूमिका घेणे अयोग्य असल्याचेदेखील कोमल नाहटा यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Mediaमाध्यमेnagpurनागपूर