शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:22 IST

देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ठळक मुद्देकोमल नाहटा यांचा प्रश्न : गैरप्रकार समोर यायला हवे, मात्र दुरुपयोग नको

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.‘नागपूर प्रेस क्लब’तर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, वरिष्ठ पत्रकार राहुल पांडे उपस्थित होते. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र, या मोहिमेतून अनेकांची नाहक बदनामी होत आहे. याचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेतील सगळेच खरे बोलत आहेत असे नसून अनेक लोक हे ‘बहती गंगा मे’ हात धुण्याचे काम करीत आहेत. यात काहींचे आरोप खरे असले तरी काही मुली केवळ प्रसिद्धी झोतात येणे किंवा बदला घेण्याच्या भावनेने आरोप करीत असल्याचेही ते म्हणाले.चित्रपटांवर परिणाम नाही‘मी टू’ मोहिमेमुळे येणाऱ्या आगामी चित्रपटांवर फारसा परिणाम होणार नाही. प्रेक्षकांना चित्रपटाशी घेणेदेणे असते. चित्रपटाचे कथानक, मांडणी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजन याला महत्त्व असते. त्याचा व्यवसायावर परिणाम होत नाही. ‘मी टू’अंतर्गत आरोप झाले म्हणून उतावीळ होत कलाकारांनी आता मी या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही अशी भूमिका घेणे अयोग्य असल्याचेदेखील कोमल नाहटा यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Mediaमाध्यमेnagpurनागपूर