शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनात सरकारची बनवाबनवी, राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:34 IST

नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज विधानसभेत कमालीची आक्रमक भूमिका स्वीकारल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

नागपूर- नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज विधानसभेत कमालीची आक्रमक भूमिका स्वीकारल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनात झालेल्या बनवाबनवीचे कागदोपत्री पुरावे सभागृहात मांडल्याने सरकारची चांगलीच गोची झाली.

विखे पाटील यांनी आज नाणार प्रकल्पाबाबत नियम 57 आणि 97 अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. नाणार प्रकल्पाला लोकांचा प्रचंड विरोध असून, सरकार बनावट संमतीपत्रांच्या आधारे भूसंपादन करते आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी नाणारचे नागरिक थेट नागपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सभागृहाचे उर्वरित कामकाज स्थगित करून नाणार प्रकल्पाबाबत चर्चा घ्यावी आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडली. सरकारने चर्चा न केल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र यासंदर्भात सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट न झाल्याने विरोधी पक्षांचे आमदार प्रचंड आक्रमक झाले होते.विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावाबाबत निवेदन करताना विखे पाटील यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, नाणार प्रकल्पातील 17 पैकी 10 गावांच्या सरपंचांनी काल माझी भेट घेतली. या प्रकल्पाला सर्वच्या सर्व 17 गावांनी विरोध दर्शवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन संमती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पहिल्या तीन गावांतच टोकाचा विरोध झाल्याने ग्रामसभा घेण्याचा विचार प्रशासनाला सोडून द्यावा लागला.  या प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या नागरिकांची संमतीपत्रे घेतल्याचा दावा सरकार करते आहे. परंतु हा दावा साफ खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. मूळ कोकणवासी नसलेल्या बाहेरील काही नागरिकांनी या गावांमध्ये जमिनी खरेदी करून ठेवल्या होत्या; त्या नागरिकांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला देत असल्याचे संमतीपत्रं सरकारला दिली आहेत, असे सांगून विखे पाटील यांनी गोठीवरे गावातील खरेदी व्यवहारांची एक यादीच सभागृहात सादर केली.त्याचप्रमाणे गोठीवरे येथील मारुती सीताराम मांजरेकर नामक व्यक्ती पोलीस रेकॉर्डनुसार मागील 20 वर्षांपासून बेपत्ता आहे. परंतु बेपत्ता असलेल्या मांजरेकर यांचे बनावट आधारकार्ड तयार करून त्यांचे कुलमुखत्यार पत्र तयार करण्यात आले व त्या आधारे नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. यासंदर्भात अ‍ॅड. अश्विनी आगाशे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली व प्रशासनबनवाबनवी करून भूसंपादन करीत असल्याचा ठपका ठेवला.दरम्यान, यासंदर्भात प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाणारबाबत दोन्ही सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, विरोधी पक्षाने मांडलेल्या स्थगन प्रस्तावमध्ये मतदानाची तरतूद आहे. हा प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असती तर त्यांनी या स्थगन प्रस्तावाला पाठिंबा देऊन यावर चर्चा करण्याचा आग्रह सरकारकडे धरायला हवा होता. मात्र त्याऐवजी त्यांनी गोंधळ घालून सभागृह बंद पाडले व अप्रत्यक्षरीत्या सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष नाणारबाबत कोकणवासीयांची फसवणूक करीत असल्याच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बोंडअळी, मावा, तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली संपूर्ण मदत तातडीने बँक खात्यात जमा करण्याची मागणीही यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी लावून धरली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील