शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

चारित्र्यहनन करणे आत्महत्येस प्रोत्साहन

By admin | Updated: February 23, 2015 02:35 IST

एखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन देणेच होय असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे.

राकेश घानोडे नागपूर एखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन देणेच होय असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे. चारचौघांसमोर चारित्र्यहनन करणे ही संबंधित व्यक्तीच्या मनाला खिन्न व वैफल्यग्रस्त करणारी कृती आहे. चारित्र्यहननानंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असा विचार करून ती व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकते, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. एका ग्रामीण अविवाहित मुलीवर सार्वजनिकरीत्या अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आला होता. यामुळे त्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी प्रकरणातील आरोपी दाम्पत्याचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना यासंदर्भात विस्तृत खुलासा केला आहे. चारित्र्यावरील बेपर्वा, धक्कादायक व मानहानी करणारे आरोप कोणत्याही अविवाहित मुलीला निराशेच्या खाईत ढकलण्यास पुरेसे आहेत. आरोप सार्वजनिकरीत्या करण्यात आल्याने, आरोप करणारा पुरुष विवाहित असल्याने व आरोपांचे स्वरूप समाजातील प्रतिमा मलीन करणारे असल्यामुळे त्या मुलीची केवळ विवाहाची संभावनाच कमी झाली नव्हती तर, तिचे समाजात ताठ मानेने जगणेही कठीण झाले होते. गलिच्छ आरोपांनंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असे एका ग्रामीण अविवाहित मुलीला वाटणे साहजिक आहे. परिणामी तिने निराश होऊन जीवन संपविण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचा विचार केला असेल. यामुळे आरोपींची कृती आत्महत्येस प्रवृत्त करणारी आहे असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे. प्रोत्साहनाचा दुसरा प्रकारभादंविच्या कलम १०७ अन्वये प्रोत्साहन म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त करणे किंवा त्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यास जाणीवपूर्वक सहकार्य करणे किंवा एखाद्या कटांतर्गत दुसऱ्या व्यक्तीसोबत मिळून ती गोष्ट करण्यासाठी चिथावणी देणे होय. याप्रकरणात आरोपींनी मृताला विष प्राशन करण्यास सहकार्य केले नाही. तसेच, दोघांनी कट रचल्याचेही पुरावे नाहीत. परंतु, हे प्रकरण प्रोत्साहनाच्या दुसऱ्या प्रकारात मोडणारे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.काय आहे प्रकरणप्रेमिला बंडू डहाट (२७) व बंडू डहाट (३०) अशी आरोपींची नावे असून ते धापेवाडा, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव कविता (काल्पनिक नाव) होते. ती शेतात मजुरी करीत होती. कविताचे बंडूसोबत अनैतिक संबंध असल्याचा प्रेमिलाला संशय होता. ४ मार्च १९९४ रोजी दोन्ही आरोपी कविताच्या घरी गेले. दरम्यान, कविताने अनैतिक संबंधाचा आरोप फेटाळून लावला, तर बंडूने अनैतिक संबंध असल्याचे स्वीकार केले. त्याचवेळी कविताने आतल्या खोलीत जाऊन विष प्राशन केले. २० फेब्रुवारी २००१ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.