शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

चारित्र्यहनन करणे आत्महत्येस प्रोत्साहन

By admin | Updated: February 23, 2015 02:35 IST

एखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन देणेच होय असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे.

राकेश घानोडे नागपूर एखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन देणेच होय असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे. चारचौघांसमोर चारित्र्यहनन करणे ही संबंधित व्यक्तीच्या मनाला खिन्न व वैफल्यग्रस्त करणारी कृती आहे. चारित्र्यहननानंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असा विचार करून ती व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकते, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. एका ग्रामीण अविवाहित मुलीवर सार्वजनिकरीत्या अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आला होता. यामुळे त्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी प्रकरणातील आरोपी दाम्पत्याचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना यासंदर्भात विस्तृत खुलासा केला आहे. चारित्र्यावरील बेपर्वा, धक्कादायक व मानहानी करणारे आरोप कोणत्याही अविवाहित मुलीला निराशेच्या खाईत ढकलण्यास पुरेसे आहेत. आरोप सार्वजनिकरीत्या करण्यात आल्याने, आरोप करणारा पुरुष विवाहित असल्याने व आरोपांचे स्वरूप समाजातील प्रतिमा मलीन करणारे असल्यामुळे त्या मुलीची केवळ विवाहाची संभावनाच कमी झाली नव्हती तर, तिचे समाजात ताठ मानेने जगणेही कठीण झाले होते. गलिच्छ आरोपांनंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असे एका ग्रामीण अविवाहित मुलीला वाटणे साहजिक आहे. परिणामी तिने निराश होऊन जीवन संपविण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचा विचार केला असेल. यामुळे आरोपींची कृती आत्महत्येस प्रवृत्त करणारी आहे असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे. प्रोत्साहनाचा दुसरा प्रकारभादंविच्या कलम १०७ अन्वये प्रोत्साहन म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त करणे किंवा त्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यास जाणीवपूर्वक सहकार्य करणे किंवा एखाद्या कटांतर्गत दुसऱ्या व्यक्तीसोबत मिळून ती गोष्ट करण्यासाठी चिथावणी देणे होय. याप्रकरणात आरोपींनी मृताला विष प्राशन करण्यास सहकार्य केले नाही. तसेच, दोघांनी कट रचल्याचेही पुरावे नाहीत. परंतु, हे प्रकरण प्रोत्साहनाच्या दुसऱ्या प्रकारात मोडणारे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.काय आहे प्रकरणप्रेमिला बंडू डहाट (२७) व बंडू डहाट (३०) अशी आरोपींची नावे असून ते धापेवाडा, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव कविता (काल्पनिक नाव) होते. ती शेतात मजुरी करीत होती. कविताचे बंडूसोबत अनैतिक संबंध असल्याचा प्रेमिलाला संशय होता. ४ मार्च १९९४ रोजी दोन्ही आरोपी कविताच्या घरी गेले. दरम्यान, कविताने अनैतिक संबंधाचा आरोप फेटाळून लावला, तर बंडूने अनैतिक संबंध असल्याचे स्वीकार केले. त्याचवेळी कविताने आतल्या खोलीत जाऊन विष प्राशन केले. २० फेब्रुवारी २००१ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.