शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

समर्पित कार्यकर्त्यांचे चरित्र समोर यावे

By admin | Updated: October 10, 2016 02:29 IST

आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू

नागपूर : आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू झालेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला. अनेकांनी आपल्या समर्पित वृत्तीने आदर्श प्रस्थापित केला. सुंदरलालजी राय हेदेखील त्यातीलच होते. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांचे चरित्र समाजासमोर आणले पाहिजे, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोहाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय व डॉ. रुपा राय हे उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दीला रविवारपासून सुरुवात होत आहे. दोन्हीही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी आहे. दोघांचेही आयुष्य कमी होते, पण काम मोठे होते. त्यामुळे आयुष्य किती जगले यापेक्षा कसे जगले याला महत्त्व असते, असे प्रतिपादन राम नाईक यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांच्या कार्यात साम्य आहे. संघर्षातून यांनी कामाला सुरुवात केली. प्रसंगी विरोध व उपहास यांचा सामना केला व जनसंघाचा पाया रचला. देशात ४५० राजकीय पक्ष आहेत. त्यातील ४४५ पक्ष कुठल्या ना कुठल्या कुटुंबाचे आहेत. विचारांवर आधारित व सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला मोठे करण्याचे काम याच समर्पित भावनेने केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुंदरलाल राय यांच्या सारख्यांनी संघर्ष केला म्हणून आज आजचे सत्तेचे दिवस आम्हाला पहायला मिळाले. त्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर समर्पक पद्धतीने आणण्याची आवश्यकता आहे. हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांनी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्र निर्माणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या कार्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी जन्मशताब्दी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोले यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर डॉ.रुपा राय यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दी सोहळ््याच्या उद््घाटनप्रसंगी विचार व्यक्त करताना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, डॉ. रुपा राय व अनुपम राय उपस्थित होते.