शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समर्पित कार्यकर्त्यांचे चरित्र समोर यावे

By admin | Updated: October 10, 2016 02:29 IST

आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू

नागपूर : आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू झालेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला. अनेकांनी आपल्या समर्पित वृत्तीने आदर्श प्रस्थापित केला. सुंदरलालजी राय हेदेखील त्यातीलच होते. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांचे चरित्र समाजासमोर आणले पाहिजे, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोहाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय व डॉ. रुपा राय हे उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दीला रविवारपासून सुरुवात होत आहे. दोन्हीही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी आहे. दोघांचेही आयुष्य कमी होते, पण काम मोठे होते. त्यामुळे आयुष्य किती जगले यापेक्षा कसे जगले याला महत्त्व असते, असे प्रतिपादन राम नाईक यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांच्या कार्यात साम्य आहे. संघर्षातून यांनी कामाला सुरुवात केली. प्रसंगी विरोध व उपहास यांचा सामना केला व जनसंघाचा पाया रचला. देशात ४५० राजकीय पक्ष आहेत. त्यातील ४४५ पक्ष कुठल्या ना कुठल्या कुटुंबाचे आहेत. विचारांवर आधारित व सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला मोठे करण्याचे काम याच समर्पित भावनेने केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुंदरलाल राय यांच्या सारख्यांनी संघर्ष केला म्हणून आज आजचे सत्तेचे दिवस आम्हाला पहायला मिळाले. त्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर समर्पक पद्धतीने आणण्याची आवश्यकता आहे. हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांनी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्र निर्माणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या कार्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी जन्मशताब्दी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोले यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर डॉ.रुपा राय यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दी सोहळ््याच्या उद््घाटनप्रसंगी विचार व्यक्त करताना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, डॉ. रुपा राय व अनुपम राय उपस्थित होते.