शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सीमकार्ड बदलवून उडविले ४२ लाख : सायबर गुन्हेगारांनी केले ऑनलाईन पैसे ट्रान्सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:22 IST

सीमकार्ड बदलवून सायबर गुन्हेगारांनी महिला व्यावसायिकाचे ४१.५० लाख रुपये उडविल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे.

ठळक मुद्देमहिला व्यावसायिकाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीमकार्ड बदलवून सायबर गुन्हेगारांनी महिला व्यावसायिकाचे ४१.५० लाख रुपये उडविल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यापासून यापूर्वी शहरातील उद्योजकांनाही फटका बसला आहे.रामदासपेठेतील रहिवासी अवंती अभिराम देशमुख अजनीच्या अजित बेकरीत संचालक आहेत. बेकरीत आणखी काही लोक संचालक आहे. अजित बेकरी आणि मेसर्स ए. आर. फूडचे धंतोलीतील सारस्वत बँकेत खाते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खात्यात अवंती आणि इतर संचालक व्यवहार करतात. या खात्यातून कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार केल्यास त्याचे मॅसेज अवंती यांना मोबाईलवर येतात. हे सीमकार्ड अवंती यांचे पती अभिराम देशमुख यांच्या नावावर आहे. सायबर गुन्हेगारांनी अभिराम देशमुख यांच्या नावाने बनावट कागदपत्र सादर करून बीएसएनएलमध्ये सीमकार्ड हरविल्याचा अर्ज केला. त्यांच्या अर्जानुसार बीएसएनएलने २८ सप्टेबरला वापरात असलेले सीमकार्ड बंद केले. त्यामुळे अवंती यांना मॅसेज येणे बंद झाले. बीएसएनएलने बनावट कागदपत्रांच्या आधारे नवे सीमकार्ड जारी केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी अजित बेकरी आणि ए. आर. फर्मच्या खात्यातून रक्कम काढली. २८ सप्टेबरच्या दुपारी ४.३० ते ३० सप्टेबरला सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही खात्यातून वेगवेगळ्या वेळात ४१ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. ही रक्कम जाफर खान, समीर सिंह, डीजी एन्टरप्रायजेसच्या डेव्हलपमेंट, वंदना देवी यांच्या आयसीआयसीआय बँकेचे खाते आणि इंडिया फर्स्ट ट्रेडिंगच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा झाले. सीमकार्ड बंद असल्यामुळे अवंती यांना याची माहिती झाली नाही. ३० सप्टेबरला बँकेच्या कर्मचाऱ्याने अवंती यांना या व्यवहाराची माहिती दिली. त्या त्वरित बँकेत गेल्या असता त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. पैसे जमा झालेल्या फर्मसोबत काहीच संबंध नसल्याचे सांगून सीमकार्ड बंद असल्यामुळे हे घडल्याचे लक्षात आले. त्यांनी धंतोली पोलिसात गुन्हा दाखल केला. ठाणेदार विजय आकोत यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड घेण्यातआल्याचे समजले. सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि दुसऱ्या राज्यातून हा गुन्हा घडविला असून त्यांना अभिराम देशमुख आणि बँक खात्याची माहिती कशी मिळाली हा प्रश्न आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी चौकशी न करता सीमकार्ड कसे दिले हा प्रश्न आहे. यासंदर्भात धंतोली पोलीस पुण्याला जाणार आहेत.४२ तासात केले पैसे ट्रान्सफरसायबर गुन्हेगारांनी शनिवारी दुपारी ४.३० ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत ४२ तासात पैसे ट्रान्सफर केले आहेत. सुटीचा दिवस असल्यामुळे ग्राहक मोबाईल कंपनीशी संपर्क साधत नाहीत. मॅसेज न आल्यामुळे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली नाही. सोमवारी बँक उघडल्यानंतर पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. पोलीस ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्या आधारे आरोपींचा तपास करीत आहेत. या प्रकारे फसवणूक झाल्याच्या यापूर्वी पाच घटना घडल्या आहेत. एका व्यापाऱ्याचे असे लाखो रुपये सारस्वत बँकेतून उडविल्यामुळे पोलिसांना बँकेतील कर्मचाऱ्यांवर संशय आहे. सायबर गुन्हेगार नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवून फसवणूक करीत असून सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांची विशेष शाखा आहे. तरीसुद्धा अशा घटना घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइनfraudधोकेबाजी