शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

संविधान बदलाचे वारे, सावध होण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:20 IST

देशात संविधान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गाफिल राहू नये, सावध व्हा, असा इशारा ठाणे येथे भरलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे दिला.

ठळक मुद्देराष्ट्रीय चर्चासत्रात उत्तम कांबळे

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशात संविधान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गाफिल राहू नये, सावध व्हा, असा इशारा ठाणे येथे भरलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे दिला.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉ. आंबेडकर कॉलेजी दीक्षाभूमी आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीतील दादासाहेब कुंभारे सभागृहात राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ‘प्रा. वामन निंबाळकर व डॉ. ज्योती लांजेवार वाङ्मय लेखन व सामाजिक-सांस्कृतिक कर्तृत्व’ या विषयावर आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते. विचारवंत व समीक्षक डॉ. वि.स.जोग हे प्रमुख अतिथी होते. डॉ. आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार आणि पी.डब्ल्यू.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी वामन निंबाळकर आणि ज्योती लांजेवार यांच्या कवितांवर प्रकाश टाकला. या दोन्ही व्यक्ती चळवळीतून आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या लेखणीला धार होती, असेही ते म्हणाले.वि.स. जोग यांनी वामन निंबाळकर आणि ज्योती लांजेवार या आंबेडकरी-दलित कवितेतील वाघ असल्याचे स्पष्ट केले.प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके यांनी भूमिका विषद केली. प्रा. रवींद्र तिरपुडे यांनी संचालन केले. प्रा. अमृता डोर्लीकर यांनी आभार मानले.यावेळी पार पडलेल्या चर्चासत्रात डॉ. अजय देशपांडे, अशोक थूल, डॉ. सिद्धार्थ बुटले, डॉ. निशा शेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. विकास सिडाम, डॉ. देवानंद खोब्रागडे, डॉ. मनिषा नागपुरे आणि डॉ. जलदा ढोके यांचा सहभाग होता.आंबेडकरी-दलित साहित्याने पारंपरिक लेखनातून बाहेर पडावेआंबेडकरी-दलित साहित्यात पारंपरिक लेखनच होत आहे. यातून आता बाहेर पडण्याची गरज आहे. दलितांनी आदिवासींवर, आदिवासींनी दलितांवर लिहिण्याची गरज आहे. जागतिकीकरणामुळे मोठे परिणाम होत आहे त्यावरही लिखाण होण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर