शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 20:50 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

ठळक मुद्देविदर्भात उद्यापासून उघाड बहुतेक जिल्ह्यात रात्री बरसला

नागपूर : पावसाळा डिसेंबरपर्यंत वाढणार,दिवाळीच्या काळात चक्रीवादळ येणार,अशा बातम्या पसरवून भीती दाखविली जात आहे. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत खुलासा केला. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटा जवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती असून येत्या दाेन दिवसात बेटाच्या पश्चिमेला कमी दाबाचे आणि धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावाने दिवाळीनंतर २६ व २७ तारखेला आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयला पश्चिम-मध्य समुद्रात कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. ८-१० दिवसानंतर चित्र अधिकच स्पष्ट होईल पण नागरिकांनी याची भीती बाळगण्याचे कारण नाही,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी यवतमाळ,वर्धा वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात उघाड हाेता. वर्ध्यात १२ तासात २५ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी रात्री मात्र विदर्भात सर्वत्र पाऊस बरसला. ब्रम्हपुरी व यवतमाळला पावसाने चांगलेच झाेडपले. ब्रम्हपुरीत ५८.६ मिमी पावसाची नाेंद झाली तर,यवतमाळात सकाळपर्यंत ४४.२ मिमी नाेंदविण्यात आला. नागपूरला सकाळपर्यंत २६.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पारशिवनीला ४०.१ मिमी सह जाेरदार हजेरी लावली. गाेंदियात १८.४ मिमी पाऊस झाला. इतर ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे दिवसाचे तापमान खाली घसरले आहे.

२० ऑक्टाेबरनंतर माघारी....

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यात बुधवारपासून पावसाची उघडीप राहील. मात्र पुढचे एक-दाेन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात गुरुवार नंतरच उघाड हाेईल. दरम्यान परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टाेबरनंतर ताे महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेर निघून जाईल,असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :weatherहवामान