शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 20:50 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

ठळक मुद्देविदर्भात उद्यापासून उघाड बहुतेक जिल्ह्यात रात्री बरसला

नागपूर : पावसाळा डिसेंबरपर्यंत वाढणार,दिवाळीच्या काळात चक्रीवादळ येणार,अशा बातम्या पसरवून भीती दाखविली जात आहे. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत खुलासा केला. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटा जवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती असून येत्या दाेन दिवसात बेटाच्या पश्चिमेला कमी दाबाचे आणि धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावाने दिवाळीनंतर २६ व २७ तारखेला आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयला पश्चिम-मध्य समुद्रात कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. ८-१० दिवसानंतर चित्र अधिकच स्पष्ट होईल पण नागरिकांनी याची भीती बाळगण्याचे कारण नाही,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी यवतमाळ,वर्धा वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात उघाड हाेता. वर्ध्यात १२ तासात २५ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी रात्री मात्र विदर्भात सर्वत्र पाऊस बरसला. ब्रम्हपुरी व यवतमाळला पावसाने चांगलेच झाेडपले. ब्रम्हपुरीत ५८.६ मिमी पावसाची नाेंद झाली तर,यवतमाळात सकाळपर्यंत ४४.२ मिमी नाेंदविण्यात आला. नागपूरला सकाळपर्यंत २६.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पारशिवनीला ४०.१ मिमी सह जाेरदार हजेरी लावली. गाेंदियात १८.४ मिमी पाऊस झाला. इतर ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे दिवसाचे तापमान खाली घसरले आहे.

२० ऑक्टाेबरनंतर माघारी....

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यात बुधवारपासून पावसाची उघडीप राहील. मात्र पुढचे एक-दाेन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात गुरुवार नंतरच उघाड हाेईल. दरम्यान परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टाेबरनंतर ताे महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेर निघून जाईल,असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :weatherहवामान