शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 20:50 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

ठळक मुद्देविदर्भात उद्यापासून उघाड बहुतेक जिल्ह्यात रात्री बरसला

नागपूर : पावसाळा डिसेंबरपर्यंत वाढणार,दिवाळीच्या काळात चक्रीवादळ येणार,अशा बातम्या पसरवून भीती दाखविली जात आहे. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत खुलासा केला. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटा जवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती असून येत्या दाेन दिवसात बेटाच्या पश्चिमेला कमी दाबाचे आणि धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावाने दिवाळीनंतर २६ व २७ तारखेला आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयला पश्चिम-मध्य समुद्रात कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. ८-१० दिवसानंतर चित्र अधिकच स्पष्ट होईल पण नागरिकांनी याची भीती बाळगण्याचे कारण नाही,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी यवतमाळ,वर्धा वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात उघाड हाेता. वर्ध्यात १२ तासात २५ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी रात्री मात्र विदर्भात सर्वत्र पाऊस बरसला. ब्रम्हपुरी व यवतमाळला पावसाने चांगलेच झाेडपले. ब्रम्हपुरीत ५८.६ मिमी पावसाची नाेंद झाली तर,यवतमाळात सकाळपर्यंत ४४.२ मिमी नाेंदविण्यात आला. नागपूरला सकाळपर्यंत २६.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पारशिवनीला ४०.१ मिमी सह जाेरदार हजेरी लावली. गाेंदियात १८.४ मिमी पाऊस झाला. इतर ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे दिवसाचे तापमान खाली घसरले आहे.

२० ऑक्टाेबरनंतर माघारी....

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यात बुधवारपासून पावसाची उघडीप राहील. मात्र पुढचे एक-दाेन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात गुरुवार नंतरच उघाड हाेईल. दरम्यान परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टाेबरनंतर ताे महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेर निघून जाईल,असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :weatherहवामान