शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 20:50 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

ठळक मुद्देविदर्भात उद्यापासून उघाड बहुतेक जिल्ह्यात रात्री बरसला

नागपूर : पावसाळा डिसेंबरपर्यंत वाढणार,दिवाळीच्या काळात चक्रीवादळ येणार,अशा बातम्या पसरवून भीती दाखविली जात आहे. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.

हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत खुलासा केला. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटा जवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती असून येत्या दाेन दिवसात बेटाच्या पश्चिमेला कमी दाबाचे आणि धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावाने दिवाळीनंतर २६ व २७ तारखेला आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयला पश्चिम-मध्य समुद्रात कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. ८-१० दिवसानंतर चित्र अधिकच स्पष्ट होईल पण नागरिकांनी याची भीती बाळगण्याचे कारण नाही,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी यवतमाळ,वर्धा वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात उघाड हाेता. वर्ध्यात १२ तासात २५ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी रात्री मात्र विदर्भात सर्वत्र पाऊस बरसला. ब्रम्हपुरी व यवतमाळला पावसाने चांगलेच झाेडपले. ब्रम्हपुरीत ५८.६ मिमी पावसाची नाेंद झाली तर,यवतमाळात सकाळपर्यंत ४४.२ मिमी नाेंदविण्यात आला. नागपूरला सकाळपर्यंत २६.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पारशिवनीला ४०.१ मिमी सह जाेरदार हजेरी लावली. गाेंदियात १८.४ मिमी पाऊस झाला. इतर ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे दिवसाचे तापमान खाली घसरले आहे.

२० ऑक्टाेबरनंतर माघारी....

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यात बुधवारपासून पावसाची उघडीप राहील. मात्र पुढचे एक-दाेन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात गुरुवार नंतरच उघाड हाेईल. दरम्यान परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टाेबरनंतर ताे महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेर निघून जाईल,असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :weatherहवामान