शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीच्या आव्हानांनी त्यांना 'सावित्री' बनविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:55 IST

भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मी सावित्री’ने बोलते केले : महिला, मुलींनी मांडला रोजचा संघर्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दहा वर्षापूर्वी पतीचे आकस्मिक निधन झाले तेव्हा गीताताईचे वय कमीच होते. अंगावर तीन मुलांची जबाबदारी होती. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाचा, नातेवाईकांचाही आधार मिळाला नाही. अशा परिस्थितीत ती सावित्री झाली. एकटीने हिमतीने कष्ट उपसत मुलांना शिकविले, छोटेसे हक्काचे घर बांधले, मुलीचे लग्न केले, मुले नोकरीलाही लागली. पण तीच मुले लग्नानंतर वेगळा संसार मांडायला निघाली. बांधलेले घर जोडून ठेवण्याचे नवे आव्हान गीताताई समोर आहे. अशीच एक ऋचिता. मुलाशी मैत्री केली म्हणून घरच्यांनी शिक्षणच बंद करून घरात डांबले. अशावेळी ७० वर्षाची आजी तिच्यामागे सावित्री बनून खंबीरपणे उभी राहिली व शिक्षणासाठी नागपूरला पाठविले. ही ऋचिता आज एम.ए. (इंग्लिश) च्या फायनल इयरला आहे. रोजच्या जीवनात संघर्ष करताना अशा असंख्य सावित्रीच्या लेकी आपल्या आसपास आहेत. त्यातीलच काहींनी आपल्या संघर्षाचा उलगडा केला.भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले. संघटनेच्या संयोजक रश्मी पारसकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयाच्या, स्तराच्या महिला व मुलींनी आपला संघर्ष मुक्तपणे मांडला. लठ्ठपणामुळे घरच्यांचा चिंतासूर ऐकणारी व बाहेरच्यांची टिंगल सहन करणारी अंकिता, कमी वयातच पतीच्या निधनामुळे सहन करावा लागत असलेला मानसिक त्रास मांडणारी भारती, अशा अनेक स्त्रियांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या. प्रत्येक क्षेत्रात वावरणाऱ्या स्त्रीला संघर्ष करावा लागतो. तिच्या असण्या-दिसण्यावरून, कमजोर समजण्यावरून बरेचदा आप्त व समाजाशी संघर्ष करावा लागतो. तो लहान असो की मोठा, संघर्ष केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हेच यातून दिसून येते. पत्रकार रश्मी मदनकर यांनी मार्गदर्शन करीत युवकांना केवळ स्वत: पुरते जगू नका इतरांसाठी जगा, इतरांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळणारे समाधान हे शाश्वत राहत असल्याचे सांगितले. दर्शना व जितेशा चावरे या दाम्पत्याची ‘सावित्री’ नावाची चिमुकली कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. सावित्री आईच्या कार्याचे सतत स्मरण होत राहावे म्हणून मुलीचे नाव सावित्री ठेवल्याचे आईने यावेळी सांगितले. संचालन स्नेहल वानखेडे हिने केले. आयोजनात योगिता भिवापूरकर, अलका वेखंडे यांचा सहभाग होता.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेnagpurनागपूर