शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून केंद्रीय कार्यालयांकडून अडवणूक

By admin | Updated: June 27, 2014 00:36 IST

राज्य शासनाच्या प्राधिकृत यंत्रणेकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे ही केंद्रीय प्राधिकरणासाठी स्वीकारार्ह असताना काही केंद्रीय प्राधिकरणातील अधिकारी केंद्राच्या ‘फॉर्मेट’नुसारच प्रमाणपत्राची मागणी करीत

नागपूर: राज्य शासनाच्या प्राधिकृत यंत्रणेकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे ही केंद्रीय प्राधिकरणासाठी स्वीकारार्ह असताना काही केंद्रीय प्राधिकरणातील अधिकारी केंद्राच्या ‘फॉर्मेट’नुसारच प्रमाणपत्राची मागणी करीत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.अलीकडेच रेल्वे आणि केंद्रीय पोलीस दलाच्या भरतीच्या वेळी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर केलेल्या प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्याने आक्षेप घेऊन त्यांना केंद्राच्या ‘फॉर्मेट’मध्ये जात प्रमाणपत्राची मागणी केली होती. हे येथे उल्लेखनीय.राज्य शासनातर्फे ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातून जात प्रमाणपत्रे दिली जातात. ही देताना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांची पूर्तता केली जाते. राज्य शासनाच्या सर्व प्राधिकरणात ती स्वीकारली जातात. यापूर्वी केंद्रीय कार्यालयात व तेथील नोकर भरतीच्या वेळी ती नाकारली जात नव्हती. मात्र यंदा केंद्राचे काही प्राधिकरणे ती स्वीकारत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जात प्रमाणपत्रे केंद्राच्याच ‘फॉर्मेट’मध्ये ती असावी असा त्यांचा आग्रह असतो.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जात प्रमाणपत्रासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या नियम आणि निकषाचा आधार घेऊनच राज्य शासनाने जात प्रमाणपत्राचा ‘फॉर्मेट’ तयार केला असून तो सगणात टाकला आहे. यात केंद्र सरकारने २०११ पर्यंत केलेल्या सर्व दुरुस्तींचा समावेश आहे. मात्र केंद्र सरकारच्या ‘फॉर्मेट’मध्ये २००१ पर्यंतच्याच दुरुस्तीचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही प्रमाणपत्रात थोडा फरक आहे. पण राज्य शासनाने दिलेले प्रमाणपत्र हे सर्वत्र लागू पडते. असे असतानाही रेल्वे व केंद्रीय पोलीस भरतीच्या वेळी अनेक उमेदवारांचे जात प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याने त्यांची मोठी धावपळ उडाली होती. प्रमाणपत्रात बदल करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला नाही. त्यामुळे उमेदवार अडचणीत सापडले होते. त्यांची वणवण सुरू होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयानेच याबाबत तोडगा काढला. मात्र हा प्रश्न सध्या निकाली निघाला असला तरी भविष्यात पुन्हा निर्माण होणार नाही याबाबत साशंक ता आहे. (प्रतिनिधी)