शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

निर्मला सीतारामन यांच्यापुढे ‘ही’ आहेत आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 10:40 IST

भारताच्या नव्या अर्थमंत्री म्हणून श्रीमती निर्मला सीतारामन यांची नियुक्ती झाली आहे. १९६९-१९७० साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर आता ४९ वर्षांनी देशाला पुन्हा एकदा महिला वित्तमंत्री आणि त्याही अर्थशास्त्रात एम.ए. झालेल्या मिळाल्या आहेत.

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताच्या नव्या अर्थमंत्री म्हणून श्रीमती निर्मला सीतारामन यांची नियुक्ती झाली आहे. १९६९-१९७० साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर आता ४९ वर्षांनी देशाला पुन्हा एकदा महिला वित्तमंत्री आणि त्याही अर्थशास्त्रात एम.ए. झालेल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने सीतारामन कशा पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

बेरोजगारी : नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या (एनएसएसओ) अहवालानुसार देशात सध्या ७.८० कोटी बेरोजगार आहेत. यामुळे ३५ ते ४० कोटी जनता प्रभावित झाली आहे. या सर्वांना रोजगार/नोकऱ्या देणे हे सीतारामन यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असेल.

अन्नधान्य उत्पादन : सध्या देशात २७० दशलक्ष टन अन्नधान्य कृषी क्षेत्रात उत्पन्न होते. हे उत्पादन वाढले तर ग्रामीण भागात रोजगार वाढतो. सध्या कृषी क्षेत्राची वाढ २.५० ते ३.५० टक्के आहे. ती ४ टक्के वाढवणे म्हणजे अन्नधान्य उत्पादन दरवर्षी १०.८० दशलक्ष टनाने वाढवणे आवश्यक आहे. हे सीतारामन यांचेपुढील दुसरे आव्हान असेल.

जीडीपीचा दर : गेल्या पाच वर्षात जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) वाढीचा दर ७.२० टक्क्यावरून ६.५० टक्क्यावर कमी झाला आहे. तो वाढवण्यासाठी औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सध्याच्या ५ टक्क्यावरून १० ते १२ टक्के व सेवाक्षेत्र वाढीचा दर सध्याच्या ९-१० टक्यावरून १२ ते १४ टक्के करणे आवश्यक आहे.

निर्यात वाढवणे : भारताची दरवर्षी निर्यात ३५० अब्ज डॉलर्स व आयात ४५० अब्ज डॉलर्स अशी असते. त्यामुळे विदेश व्यापारातील तोटा १०० अब्ज डॉलर्स (७ लाख कोटी रुपये) एवढा असतो व तो जीडीपीच्या जवळपास ३.५० टक्के असतो. तो दोन टक्क्यावर आणण्यासाठी निर्यात ५० ते ६० अब्ज डॉलर्सने वाढवणे आवश्यक आहे.

थकीत कर्जाचा डोंगर - देशातील १८ सरकारी बँकांचे थकीत कर्ज ९.५० लाख कोटीवर पोहचले आहे. याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर लिझींग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आय एल अँड एफएस) या सरकारी कंपनीने बँकांचे तब्बल ९६००० कोटी थकवले आहेत. हे १०.५० लाख कोटी वसूल करून सरकारी बँकांना पुन्हा कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे.

वित्तीय तूट - सरकारने अर्थसंकल्पातून योजना खर्च गैर योजना खर्च हटवला असला तरी केंद्र व राज्य सरकारांची मिळकत अर्थसंकल्पीय अथवा वित्तीय तूट जीडीपीच्या ७ टक्के म्हणजे १६.५० लाख कोटीवर पोहचली आहे. सरकारी रोख्यामार्फत कर्ज उभारून सरकार खर्च चालवते आहे. त्यामुळे ही तूट किमान ३.५० टक्क्याने कमी होणे आवश्यक आहे.

कंपनी कराचा दर - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचेकडे कंपनी व्यवहार मंत्रालयाचाही कार्यभार आहे. गेल्या (२०१८ च्या) अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्स (कंपनी कराचा) दर २५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी ३० ऐवजी २५ टक्के केला आहे.

जीएसटीचे सुलभीकरण - या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला दोन वर्षे पूर्ण होतील. जीएसटी नेटवर्क धिम्या गतीने चालते व ई-वे बिलाची प्रक्रिया किचकट व वेळ खाणारी आहे, अशी व्यापार उद्योग क्षेत्राची तक्रार आहे. त्यामुळे जीएसटीचे सुलभीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन