शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

सार्वजनिक जमीन समाज भवनाला वाटप करण्याच्या आदेशाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:53 IST

हायकोर्टात याचिका : राज्य सरकारने घेतली नाही विरोधाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाभूळखेडामधील अभयनगर येथील सार्वजनिक उपयोगाची जमीन समाज भवन, वसतिगृह व प्रशिक्षण केंद्राकरिता वाटप करण्याच्या आदेशाविरुद्ध अभय गृहनिर्माण सहकारी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. हा आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, अशी विनंती संस्थेने न्यायालयाला केली आहे.

सुमारे १०० सदस्य असलेल्या अभय गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अभयनगर ले-आउटचा नकाशा नागपूर सुधार प्रन्यासने १६ मे १९८९ रोजी मंजूर केला आहे. त्यामध्ये ९ हजार ६०० चौरस फूट सार्वजनिक जमीन सार्वजनिक उपयोगाकरिता आरक्षित आहे.

ही जमीन संस्थेने नासुप्रला हस्तांतरित केली आहे. त्यानंतर या जमिनीला सुरक्षा भिंत बांधण्यात आली. येथे मुलांना खेळण्यासाठी बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले व आजूबाजूला पेवर ब्लॉक्स लावण्यात आले. त्यावर सुमारे ३० लाख रुपये खर्च झाले. असे असताना नगर विकास विभागाच्या सचिवांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या वादग्रस्त आदेशानुसार ही जमीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीला संबंधित बांधकामांसाठी वाटप करण्यात आली आहे. 

बांधकामासाठी ५ कोटी ९६ लाख २३ हजार ८६९ रुपये मंजूर केले गेले आहेत आणि बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्याविरुद्ध सरकार व प्रशासनाला वेळोवेळी निवेदने सादर केली, पण त्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. 

राज्य सरकारला मागितले उत्तर या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता नगर विकास विभागाचे सचिव, नगर रचना विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, महानगरपालिका आयुक्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीचे सचिव यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली 

  • याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ अॅड. शशिभूषण वाहाणे यांनी बाजू मांडताना विविध महत्त्वपूर्ण मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. 
  • परिसरातील नागरिक या ठिकाणी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करतात. 
  • ज्येष्ठ नागरिक रोज सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. या परिसरात दूरपर्यंत कोठेच मोकळी जागा उपलब्ध नाही. केवळ या जमिनीमुळे परिसरात पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. 
  • परिणामी, वादग्रस्त आदेश अभयनगरातील नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करतो, असे अॅड. वाहाणे यांनी सांगितले. त्यांना अॅड. यश सवाईथूल यांनी सहकार्य केले.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय